शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लस उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात लसीकरण पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : पुरवठा न झाल्याने जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२) लसीकरण मोहीम खंडित झाली होती. मात्र सायंकाळी लसींचा साठा पुरविण्यात आल्याने ...

गोंदिया : पुरवठा न झाल्याने जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२) लसीकरण मोहीम खंडित झाली होती. मात्र सायंकाळी लसींचा साठा पुरविण्यात आल्याने शनिवारी (दि.३) जिल्ह्यात लसीकरण पूर्ववत सुरू झाले. यंदा जिल्ह्याला १५३०० कोविशिल्ड तर ११३०० कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना आता पुन्हा लसीकरण करता येणार आहे.

कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढ्यात १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यांतर्गत वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू असून जिल्ह्यात २२ जूनपासून १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार या गटात सुमारे ६.२५ लाख तरुण व युवा असून त्यांना लसीकरणासाठी उत्सुकता होती. परिणामी लसीकरण सुरू होताच या गटातील तरुण लसीकरणासाठी सरसावल्याचे दिसत आहे.

यामुळे जिल्ह्यात लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढत असून बुधवारपासूनच लसींचा तुटवडा जाणवत होता. अशात बहुतांश केंद्रांचे लसीकरण बंद पडले होते व काही मोजक्या केंद्रांवरच लसीकरण करता आले. मात्र शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवरील साठा संपल्याने लसीकरणाला ब्रेक लागला होता. अशात शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील १५३०० कोविशिल्ड व ११३०० कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

------------------------

१८-४४ गटात लसीकरण जोमात

१८-४४ या गटाचे लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी सुरुवातीपासूनच जोर धरत होती. तरुण व युवांचा हा गट असून त्यांना लसीकरणाला घेऊन उत्सुकता लागून होती. आता लसीकरण सुरू झाल्याने ते स्वत:ला सुरक्षित करून घेण्यासाठी सरसावले आहेत. यामुळेच या गटातील आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील आकडेवारी बघता ७७६०५ तरुणांनी लसीकरण करवून घेतले होते.

----------------------------

लवकरात लवकर लस घ्या

कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित कोरोनापासून बचाव करीत असल्याचे दुसऱ्या लाटेतील अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी मनातील भीती व संभ्रम बाजूला सारून लसीकरण करवून घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात लसीकरण जोमात होत असूनही वास्तविक हे प्रमाण कमीच आहे. यामुळे नागरिकांनी वेळ वाया न घालविता आपले लसीकरण करवून घेण्याची गरज आहे.