शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

जिल्ह्यातील ४४ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST

गोंदिया : राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक बघता आरोग्य विभागाकडून जेथे लसीकरणासाठी केंद्र वाढविले जात आहेत. तेथेच आता ...

गोंदिया : राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक बघता आरोग्य विभागाकडून जेथे लसीकरणासाठी केंद्र वाढविले जात आहेत. तेथेच आता नागरिकांचा कल लसीकरणाकडे वाढत असताना दिसत आहे. जिल्ह्यातील आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात बुधवारपर्यंत ४३,६९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ३७,९८७ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ५७०८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाने अवघ्या जगातच कहर केला आहे. मागील वर्षी कोरोनाची सुरुवात झाली व त्यानंतर मध्यंतरीचा काही काळ सुखाचा गेला. मात्र, आता पुन्हा फोफावत असून अवघ्या देशात पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. यात राज्यात सर्वाधिक उद्रेक असून जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारीही दिवसेंदिवस असताना दिसत आहे. कोरोनाचा हा उद्रेक बघता आरोग्य विभागाने जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करून सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून दिली आहे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्याजवळील रूग्णालय तसेच आरोग्य केंद्रात लसीकरण करता यावे. आरोग्य विभागाच्या या प्रयत्नांना यश येत असून कोरोनाचा वाढता उद्रेक बघता नागरिक आपसूकच लसीकरणासाठी पुढे येत असताना दिसत आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंतची (दि.१७) लसीकरणाची आकडेवारी बघितल्यास ४३,६९५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतल्याचे दिसत आहे. यामध्ये ३७,९८७ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ५७०८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

------------------------------

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज

जिल्ह्यात लसीकरणाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असले, तरीही आहे ती स्थिती तेवढी चांगली म्हणता येणार नाही. कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. अशात नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करवून घेण्याची गरज आहे. मात्र, आजही नागरिकांचा तेवढा प्रतिसाद नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लवकरात लवकर आपला पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी स्वत: पुढे यावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी कळविले आहे.

-------------------------------------

१३,६०० ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

कोरोनापासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच काही आजार असलेल्या नागरिकांना धोका असल्याने शासनाने ६० वर्षांवरील नागरिक तसेच ४५ वर्षांपेक्षा जास्त व्यक्त ज्यांना काही आजार आहेत, अशांसाठी लसीकरणाला परवानगी दिली आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांत लस उपलब्ध करवून दिली आहे. त्यानुसार शहरातील ५ खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू असून जिल्ह्यातील १३,६०० ज्येष्ठ नागरिकांनी खाजगी व शासकीय रुग्णालयात जाऊन पहिला डोस घेतल्याचे दिसून येत आहे. शिवाय ४५ ते ६० वयोगटातील ६१४८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.