शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:27 IST

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे एका आरोग्यसेविकेचा नुकताच मृत्यू झाला. एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक ...

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे एका आरोग्यसेविकेचा नुकताच मृत्यू झाला. एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक सहायक पद अशी ३ पदे, बोंडगावदेवी आयुर्वेदिक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद, एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांची तीन पदे, भिवखिडकी, चान्ना, पिंपळगाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमध्ये रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ऑक्सिजनवर आल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात डॉक्टर्स सेवा देण्यास इच्छुक नसतात, परिणामी आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १६ पदे मंजूर आहे. यापैकी ८ अधिकारी-कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे, उर्वरित आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केंद्राचा अतिरिक्त भार आलेला आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत २३ गावांचा समावेश होतो. गावोगावी जाऊन लसीकरण व तपासणी हे या केंद्राचे सध्या दैनंदिन कार्य आहे. आतापर्यंत केंद्रासोबतच उपकेंद्र बोन्डगावदेवी, भिवखिडकी,निमगाव, पिंपळगाव, डोंगरगाव, सिलेझरीसह सिरेगाव, गुढरी, घुसोबाटोला, बोद्रा, विहीरगाव, अरततोंडी, दाभना या गावोगावी जाऊन लसीकरण व गरज पडल्यास कोरोना चाचणी करीत आहे. अशाही परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना लसीकरण व चाचणीचे कार्य जिवाची पर्वा न करता करीत आहेत. रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना मदत होईल.

.....

जनता दरबारात उपस्थित केला होता प्रश्न

तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या जनता दरबारात हा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा त्यांनी ही रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. पण याला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. परंतु, पदे भरण्यात आली नाहीत. केंद्रातील दोन सामुदायिक अधिकारी, एक आरोग्यसेविका, एक सहायक, एक सफाई कामगार, एक एमपीडब्ल्यू कर्मचारी असे एकूण ८ जण कोरोनाबाधित झाले आहेत. आता या केंद्राचा डोलारा दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषधी निर्माता, एक बाह्यरुग्ण आरोग्य सेविका, एक साहाय्यक यांच्यावर सुरू आहे.

....

लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह

दिवसेंदिवस आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित होत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण व तपासणी कार्यात अनेक अडथळे येत आहेत आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर निर्धारित कार्य पूर्ण होत नाहीत. त्यामुळे संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.