शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

बोंडगावदेवी : शेतजमिनीतून भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या ...

बोंडगावदेवी : शेतजमिनीतून भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकरी हितावह उपक्रम राबविले जात आहे. पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नावीण्यपूर्ण पीक उत्पादन घ्यावे, कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शेतीची मशागत केल्यास भरघोष उत्पादन होऊन शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावेल असा आशावाद तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी व्यक्त केला.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत सिलेझरी येथे कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सिलेझरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी संजीवनी मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी सरपंच सुनीता ब्राम्हणकर, उपसरपंच सुखदेव मेंढे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे उपस्थित होते. रवींद्र लांजेवार म्हणाले, सध्या खरिपाचा हंगाम सुरु आहे. खरिपामध्ये भरघोष उत्पादन शेतकऱ्यांच्या दारात यावे यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी शासनाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम २१ जूनपासून १ जुलैपर्यंत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यात पिकाची लागवडीसाठी सुधारित तज्ज्ञांचा वापर करणे, श्री पद्धत, पट्टा पद्धत, चार सुत्री, ड्रम सीडरचा वापर करुन भात लागवड करण्यासंबंधी त्यांनी विस्तृत माहिती दिली. तालुक्यातील १४ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेंतर्गत दर दिवशी गावात भेट देऊन बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, भात क्षेत्रात सुधारित भात लागवड, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, तालुक्यातील क्षेत्र विकास उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, महत्त्वाचा पिकाची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना याविषयी माहिती शेतकऱ्यांना पोहच विचार असल्याचे सांगण्यात आले.