शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

वांगी शेतकऱ्यांकडून दहाला दोन किलो; ग्राहकांना मिळतायेत दहाला एक किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

गोंदिया : भाजीपाल्याची शेती करणे अत्यंत अवघड आहे. पाण्याचे संकट, पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव व अत्यंत महागडी कीटकनाशके यामुळे ...

गोंदिया : भाजीपाल्याची शेती करणे अत्यंत अवघड आहे. पाण्याचे संकट, पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव व अत्यंत महागडी कीटकनाशके यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घेणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. अत्यंत महागडी औषधे फवारणी करून पिके वाचविल्यावरही येणाऱ्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने राबराब राबूनही शेतकऱ्यांच्या अंगावरील कर्जाचे ओझे तसेच राहत आहे.

शेतकरी फळ, भाज्यांचे उत्पादन घेत असताना शेतीच्या मशागतीसाठी लागणारी मजुरी, पिकांचे नियंत्रण व संरक्षण करण्यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. परंतु शेवटी शेतकऱ्याने त्या गोष्टीचा लेखाजोखा केल्यास, त्याच्या हातात काहीच शिल्लक उरत नाही. कर्ज घेऊन शेती करणे आता शेतकऱ्यांना कठीण होत आहे. शासनाने शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पाच रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून घेतलेली वांगी बाजारात दहा रुपये किलो दराने विक्री केली जातात.

...................

शेतकऱ्यांचाही खर्च निघेना

भाजीपाला पिकवताना बियाणे महागडी आहेत. त्यांच्या मशागतीसाठी येणारा मजुरीचा दर अधिक असल्याने कठीण होत आहे. लावलेल्या पिकांना फळे किंवा भाजीपाला निघेपर्यंत सुरुवातीपासून देखरेख व अत्यंत महागडी औषधे लागत असल्याने भाजीपाल्याचीही शेती करणे आता परवडत नाही.

- विजय कुसन कोरे, शेतकरी

...................

मजुरी वाढली, बियाणे व औषधीही वाढली. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. मेहनत करणारा शेतकरीेच नाडवला जातो. आमच्याकडून अर्ध्या किमतीत घेऊन दुप्पट किमतीत विक्री करणाऱ्यांचाच फायदा होतो. दलाल व भाजी विक्रेतेच फायद्यात आहेत.

- दिलीप महारवाडे, शेतकरी, किडंगीपार

.......................

ग्राहकांना परवडेना

भाजीपाल्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने घर चालविण्यासाठी हिरव्या भाजीपाल्याबरोबर अधुनमधून कडधान्यांचा आधार घ्यावा लागतो. प्रत्येक भाजीचा दर वाढल्याने गृहिणींचे घरचे बजेट बिघडले आहे.

- जयवंता रामटेके, किडंगीपार

...............

आर्थिक मिळकत थांबली आहे. मात्र महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यात दैनंदिन गरज भागविताना भाजीपाला खरेदी करणे म्हणजे नाकी नऊ येते. परंतु पोट भरण्यासाठी भाजीपाला खरेदीच करावा लागतो.

- योगेश खोटेले, डोंगरगाव

...................

भावात एवढा फरक का?

भाजीपाल्याचे उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल बाजारात दुप्पट दराने का विक्री केला जातो, याची पडताळणी केली असता, त्या मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारा ट्रान्स्पोर्ट चार्ज, महागलेले डिझेल, दलालांची कमाई व किरकाेळ विक्रेत्यांची कमाई हे त्यात नमूद असल्याने शेतकऱ्यांकडून घेतलेला माल दुपटीने विकला जातो आहे.

...................

कोणत्या भाजीला काय भाव?

भाजीपाला--------शेतकऱ्यांचा भाव-----------ग्राहकाला मिळणारा भाव किलो

वांगी---------------------०५------------------------------१०

टोमॅटो---------------------१०-----------------------------१५

भेंडी------------------------८------------------------------१५

चवळी---------------------१२------------------------------३०

पालक---------------------४०------------------------------७०

कोथिंबीर---------------------८०------------------------------१२०

हिरवी मिरची--------------------२५-----------------------------४०

पत्ताकोबी--------------------१०------------------------------२०

फूलकोबी---------------------१८------------------------------३०

दोडका---------------------१६------------------------------३०