शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वांगी शेतकऱ्यांकडून दहाला दोन किलो; ग्राहकांना मिळतायेत दहाला एक किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

गोंदिया : भाजीपाल्याची शेती करणे अत्यंत अवघड आहे. पाण्याचे संकट, पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव व अत्यंत महागडी कीटकनाशके यामुळे ...

गोंदिया : भाजीपाल्याची शेती करणे अत्यंत अवघड आहे. पाण्याचे संकट, पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव व अत्यंत महागडी कीटकनाशके यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घेणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. अत्यंत महागडी औषधे फवारणी करून पिके वाचविल्यावरही येणाऱ्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने राबराब राबूनही शेतकऱ्यांच्या अंगावरील कर्जाचे ओझे तसेच राहत आहे.

शेतकरी फळ, भाज्यांचे उत्पादन घेत असताना शेतीच्या मशागतीसाठी लागणारी मजुरी, पिकांचे नियंत्रण व संरक्षण करण्यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. परंतु शेवटी शेतकऱ्याने त्या गोष्टीचा लेखाजोखा केल्यास, त्याच्या हातात काहीच शिल्लक उरत नाही. कर्ज घेऊन शेती करणे आता शेतकऱ्यांना कठीण होत आहे. शासनाने शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पाच रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून घेतलेली वांगी बाजारात दहा रुपये किलो दराने विक्री केली जातात.

...................

शेतकऱ्यांचाही खर्च निघेना

भाजीपाला पिकवताना बियाणे महागडी आहेत. त्यांच्या मशागतीसाठी येणारा मजुरीचा दर अधिक असल्याने कठीण होत आहे. लावलेल्या पिकांना फळे किंवा भाजीपाला निघेपर्यंत सुरुवातीपासून देखरेख व अत्यंत महागडी औषधे लागत असल्याने भाजीपाल्याचीही शेती करणे आता परवडत नाही.

- विजय कुसन कोरे, शेतकरी

...................

मजुरी वाढली, बियाणे व औषधीही वाढली. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. मेहनत करणारा शेतकरीेच नाडवला जातो. आमच्याकडून अर्ध्या किमतीत घेऊन दुप्पट किमतीत विक्री करणाऱ्यांचाच फायदा होतो. दलाल व भाजी विक्रेतेच फायद्यात आहेत.

- दिलीप महारवाडे, शेतकरी, किडंगीपार

.......................

ग्राहकांना परवडेना

भाजीपाल्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने घर चालविण्यासाठी हिरव्या भाजीपाल्याबरोबर अधुनमधून कडधान्यांचा आधार घ्यावा लागतो. प्रत्येक भाजीचा दर वाढल्याने गृहिणींचे घरचे बजेट बिघडले आहे.

- जयवंता रामटेके, किडंगीपार

...............

आर्थिक मिळकत थांबली आहे. मात्र महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यात दैनंदिन गरज भागविताना भाजीपाला खरेदी करणे म्हणजे नाकी नऊ येते. परंतु पोट भरण्यासाठी भाजीपाला खरेदीच करावा लागतो.

- योगेश खोटेले, डोंगरगाव

...................

भावात एवढा फरक का?

भाजीपाल्याचे उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल बाजारात दुप्पट दराने का विक्री केला जातो, याची पडताळणी केली असता, त्या मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारा ट्रान्स्पोर्ट चार्ज, महागलेले डिझेल, दलालांची कमाई व किरकाेळ विक्रेत्यांची कमाई हे त्यात नमूद असल्याने शेतकऱ्यांकडून घेतलेला माल दुपटीने विकला जातो आहे.

...................

कोणत्या भाजीला काय भाव?

भाजीपाला--------शेतकऱ्यांचा भाव-----------ग्राहकाला मिळणारा भाव किलो

वांगी---------------------०५------------------------------१०

टोमॅटो---------------------१०-----------------------------१५

भेंडी------------------------८------------------------------१५

चवळी---------------------१२------------------------------३०

पालक---------------------४०------------------------------७०

कोथिंबीर---------------------८०------------------------------१२०

हिरवी मिरची--------------------२५-----------------------------४०

पत्ताकोबी--------------------१०------------------------------२०

फूलकोबी---------------------१८------------------------------३०

दोडका---------------------१६------------------------------३०