शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

वाहतूक पोलिसांची दुचाकींवरच गाज

By admin | Updated: May 18, 2015 00:50 IST

बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर वाहतूक विभागाकडून बाजारात दुचाकी उचलून नेण्याची मोहीम राबविली जात आहे.

दुचाकी उचलण्याची मोहीम सुरूच : नागरिकांत वाहतूक विभागाप्रती रोष गोंदिया : बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर वाहतूक विभागाकडून बाजारात दुचाकी उचलून नेण्याची मोहीम राबविली जात आहे. याशिवाय शहरात चौकाचौैकात दुचाकीधारकांना पकडून त्यांना चालान केले जात आहे. फक्त दुचाकींवर होत असलेल्या या कारवाईमुळे मात्र नागरिकांत वाहतूक विभागाप्रती रोष दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. त्यामुळे शहरातीलच नव्हे तर ग्रामीण परिसरासह लगतच्या राज्यातील नागरिक आपापल्या सोयीने येथील बाजारात लग्नाच्या खरेदीसाठी येत आहेत. यामुळेच रविवारी सुटीच्या दिवशीही बाजार गर्दीने फुगून गेल्याचे दिसून येत असून बाजारपेठ खुली आहे. खरेदीसाठी येणाऱ्यांमधील सगळ््यांकडेच चारचाकी वाहने नसल्याने बहुतांश नागरिक दुचाकीने बाजारात खरेदीसाठी येत आहेत. यामुळे आपले वाहन दुकानांसमोर रस्त्याच्या कडेला लाऊनच ते दुकानात शिरतात. बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्यामुळे अर्थातच वाहनांची संख्याही वाढली बाजारात गर्दी होत आहे. नेमकी ही बाब हेरून वाहतूक पोलिसांना कारवाईची संधी मिळत आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याच्या नावावर रस्त्यावर उभ्या दुचाकींना थेट वाहनात टाकून उचलून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. कित्येकदा तर वाहनमालक दुकनांत खरेदीत व्यस्त असताना त्यांचे वाहन उचलून नेले जात असल्याने बाहेर आल्यावर मात्र वाहन न दिसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे. वाहतूक विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रथम कर्तव्य आहे. येथे मात्र उलटच कारभार सुरू आहे. वाहतूक व्यवस्थेच्या नावावर मात्र सरळ वाहने उचलून नेण्याचा व नंतर चालान फाडण्याचे प्रकार केले जात आहेत. बाजारातील हा प्रकार तर सोडाच मात्र शहरातील मुख्य चौकांतही दुचाकींना अडवून त्यांचे चालान फाडले जात असल्याचे चित्र हमखास बघावयास मिळत आहेत. दुचाकींचे कागद तपासले जात आहेत. मात्र चारचाकीची तपासणी करतानाचे चित्र दुर्लभ झाले आहे. (शहर प्रतिनिधी)चारचाकीवाल्यांना अभय वाहतूक पोलिसांनी दुचाकींना टार्गेट करून ठेवल्याचे दिसून येत आहे. चारचाकी वाहन रस्त्यावर सर्रास उभे राहतात. त्यांच्यामुळेच वाहतूकीला जास्त त्रास होतो ही वास्तवीकता आहे. मात्र असे असतानाही त्यांच्यावर कुणीही कारवाई करीत नाही. चारचाकी वाहन उभे असताना कुणी तिकडे फिरकूनही बघत नसल्याचे दररोजचे चित्र आहे. यातून नियम फक्त दुचाकींसाठीच असून चारचाकीवाल्यांना अभय दिले जात असल्याचे नागरिक बोलत आहेत. नागरिकांसोबत अरेरावीची वागणूक बाजारात वाहने उचलून नेण्यासाठी वाहतूक विभागाने टाटा एस वाहन भाड्यावर घेतले आहे. यात वाहने उचलण्यासाठी मुले, वाहन चालक व एक वाहतूक पोलीस असतो. वाहनातील ही मुले व पोलीस कर्मचारी मात्र वाहन मालकांसोबत अरेरावीची वागणूक करीत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून येत आहेत. दुचाकींना उचलून नेण्यातच ते धन्यता मानत आहेत. मात्र चारचाकीवाल्याशी कधी वाद घालताना एखादाही दिसून येत नाही.