शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी चौकात वाहतूक शिपाई नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST

केशोरी : येथील छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक येथे गावच्या चारही बाजूने रस्ते येत असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याला ...

केशोरी : येथील छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक येथे गावच्या चारही बाजूने रस्ते येत असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याला लागून खासगी व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने रस्त्यावर वाहने उभी करून ग्राहक दुकानातील साहित्य घेण्यास मग्न असतात. त्याचबरोबर विद्यार्थी-विद्यार्थिनींचा या स्थळी दिवसभर वावर असतो. याचीच दखल घेत या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवाजी चौकातून अतिवेगाने वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता नागरिकांनी व्यक्त करीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस शिपायाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी लोकमतच्या माध्यमातून नागरिकांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन ठाणेदार संदीप इंगळे यांनी शिवाजी चौकातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करून आपल्या कर्तव्य दक्षतेचा परिचर करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव या परिसरातील गावांचे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. येथील शिवाजी चौक, बसस्थानक या भागातून सतत वाहतुकीची वर्दळ असते. दिवसभर विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ये-जा असते. परिवहन महामंडळाच्या बसेसला परतून वळण घेण्यासाठी चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा वाहनचालक वाहने उभी करून दुकानातील साहित्य घेण्यासाठी जातात यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी दिसून येत होती. तरुणांचा वाहने चालविण्याचा वेग जास्त असतो. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती.