शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तिरोडा पं.स.चा अजब कारभार

By admin | Updated: June 7, 2017 00:18 IST

केंद्र शासनाची गरिबांना कामाची हमी देणारी रोजगार हमी योजनेच्या कामात मोठाच गलथान कारभार दिसून येत आहे.

काम न करताच मिळते मजुरी : रोजगार हमी, अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : केंद्र शासनाची गरिबांना कामाची हमी देणारी रोजगार हमी योजनेच्या कामात मोठाच गलथान कारभार दिसून येत आहे. तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या या कामात अनेक बोगस मजूर असून काम न करताच त्यांच्या खात्यावर मजुरी जमा केली जात आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये बुडत आहेत. महाराष्ट्र राज्यात कार्यरत जि.प. पंचायत विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम, लघू जलसिंचन व इतर यंत्रणेंतर्गत ही कामे होतात. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचे पंचायत समितीस्तरावरून नियोजन ग्रामपंचायत करते. यात पांदण रस्ते, माती काम, नाला सरळीकरण, शौचालय, गुरांचे गोठे, शेळीचे गोठे, सिमेंट रस्ते, कालवा दुरूस्ती, भातखाचर दुरूस्ती, शेततळे, विहिरी, घरकूल, क्रीडांगण दुरूस्ती अशी अनेक कामे केली जातात. पण या कामात पारदर्शकता न ठेवता जुन्या पद्धतीनुसार रोजगार हमीच्या कामावरील मजूर घरी बसून राहतो. तर काही ठिकाणी काम न करणारा माणूसही, वयाचे ६५ वर्षे पूर्ण झालेलाही हातात काठी घेवून कामाच्या ठिकाणी जावून बसून राहतो. मात्र मजुरीचा पैसा मजुराच्या खात्यात सरळ दिला जातो. ‘कामावर दाम’ ही पद्धत सर्वांना ठाऊक आहे, पण येथे वेगळीच पद्धत सुरू आहे. मस्टर आॅनलाईन काढले जाते, पण सर्व काम आॅफ लाईनच असते. मजुराला काम न करताच मजुरी दिली जाते. मस्टरवर हजेरी लावली जाते, असा प्रकार सुरू आहे. तिरोडा तालुक्यात रस्त्याचे काम व इतर कामे सुरू आहेत. त्यात रोजगार सेवकाची नेमणूक केली आहे. पण त्यांच्यामार्फत सर्व कामे अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही या धर्तीवर केली जातात. प्रत्येक मजुराकडून १०० ते १५० रूपये याप्रमाणे दर आठवड्यात घेतले जातात व १५० ते १९० रूपयांपर्यंत मजुरांना मजुरी काम न करता मोजमाप पुस्तिकेत दाखवून दिली जाते. प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकारी वर्गांनी कामाची तपासणी दोन समाजसेवक व पत्रकारांना घेवून केली तर संपूर्ण तालुक्यातील प्रकरणे समोर येवू शकतात. शासनाचे कोट्यवधी रूपये प्रत्यक्ष खर्च न करता रोहयो यंत्रणेचे कर्मचारी अर्धे आपल्या घशात घालतात. गोठे, शौचालय, नाला सरळीकरण, सिमेंट रस्त्याच्या कामात बोगस नावे दाखवून लाखो रूपयांची उचल कंत्राटदार, ग्रामसेवक, अभियंता, खंडविकास अधिकारी, विस्तार अधिकारी करीत आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही. यात काही लोकप्रतिनिधीसुद्धा सहभागी आहेत. अशी गत तिरोडा पंचायत समितीची आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळी चमू घेवून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी केली वास्तव त्यांना कळू शकेल. त्यामुळे पुढे होणाऱ्या अशा घटणा टळू शकतील, रोहयो कायद्याची पायमल्ली केंद्र शासनाने रोहयो कायदा तयार केला. पण ‘अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही’च्या नादात या कायद्याची पायमल्ली झाली आहे. संपूर्ण पैसा वाया जात आहे. शेतकऱ्याची हमी न घेता, बांध दुरूस्ती न करता शेतकऱ्याच्या जमिनीवर कंत्राटदार, कृषी सहायक, कृषी अधिकारी यांच्याकडून साठगाठ करून काम केले जात आहे.