शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील संजय ...

गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्यात आले. परिणामी बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून तीन फूट पाणी बुधवारी (दि. १५) वाहत होते. बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर ८५ टक्के भरले आहे. या धरणाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पुढील २४ तासांत या धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्यात येण्याची शक्यता आहे. या धरणातून पाणी सोडल्यास बाघ नदीच्या पाणीपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून बुधवारी तीन फूट पाणी वाहत होते. या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने देवरी, सालेकसा, आमगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यांतील नदी काठालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे १ फुटाने, तर कालीसरार धरणाचे तीन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आला आहे. बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सालेकसा आणि आमगाव तालुक्यांतील तीन-चार नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद होते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे धान पिकांना संजीवनी मिळाली असून, बळिराजा सुखावला आहे.

...................

जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस

गोंदिया : ३३.९ मिमी

आमगाव : २७.७ मिमी

तिरोडा : ८.५ मिमी

गोरेगाव : २२.५ मिमी

सालेकसा : २४.३

देवरी : ४३.३ मिमी

अर्जुनी मोरगाव : २४.९ मिमी

सडक अर्जुनी : १९.४

...................................

एकूण : २६.२ मिमी

........................

सरासरीच्या तुलनेत ८७ टक्के पाऊस

जिल्ह्यात १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत ११२१ मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत या कालावधीत १०६८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ९५.३ टक्के आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२२० मिमी पाऊस पडतो त्या तुलनेत ८७.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

..............