शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील संजय ...

गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्यात आले. परिणामी बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून तीन फूट पाणी बुधवारी (दि. १५) वाहत होते. बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर ८५ टक्के भरले आहे. या धरणाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पुढील २४ तासांत या धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्यात येण्याची शक्यता आहे. या धरणातून पाणी सोडल्यास बाघ नदीच्या पाणीपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून बुधवारी तीन फूट पाणी वाहत होते. या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने देवरी, सालेकसा, आमगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यांतील नदी काठालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे १ फुटाने, तर कालीसरार धरणाचे तीन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आला आहे. बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सालेकसा आणि आमगाव तालुक्यांतील तीन-चार नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद होते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे धान पिकांना संजीवनी मिळाली असून, बळिराजा सुखावला आहे.

...................

जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस

गोंदिया : ३३.९ मिमी

आमगाव : २७.७ मिमी

तिरोडा : ८.५ मिमी

गोरेगाव : २२.५ मिमी

सालेकसा : २४.३

देवरी : ४३.३ मिमी

अर्जुनी मोरगाव : २४.९ मिमी

सडक अर्जुनी : १९.४

...................................

एकूण : २६.२ मिमी

........................

सरासरीच्या तुलनेत ८७ टक्के पाऊस

जिल्ह्यात १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत ११२१ मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत या कालावधीत १०६८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ९५.३ टक्के आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२२० मिमी पाऊस पडतो त्या तुलनेत ८७.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

..............