शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

धापेवाडाचे तीनही टप्पे तीन वर्षांत पूर्ण करणार

By admin | Updated: May 27, 2016 01:39 IST

धापेवाडा उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास ९० हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे.

जलसंपदामंत्र्यांची ग्वाही : टप्पा-२ साठी लागणार ६०० कोटीतिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास ९० हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. टप्पा-१ हा जवळपास पूर्ण झाला असून टप्पा २ चे भूमिपूजन येत्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी डिसेंबरमध्ये करणार. एवढेच नाही तर येत्या तीन वर्षात धापेवाडा प्रकल्पाचे टप्पा-२ आणि ३ पूर्ण करणार, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरूवारी दिली. ना.महाजन यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेची पाहणी केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ना.महाजन म्हणाले, टप्पा १ चे काम पूर्ण झाल्यावर ३८००० हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. या परिसरात उन्हाळी पिके दिसत नसून येथील श्ेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खरीप पिकावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर शेतीला बारमाही पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी धापेवाडा योजनेचे टप्पा २ व ३ पूर्ण होणे गरजेचे आहे. आमदार विजय रहांगडाले त्यासाठी पाठपुरावा करीत असून हे काम तीन वर्षात होईल, असे ना.महाजन म्हणाले.या भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कारखानदारीवर नाही. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी पाण्याची गरज आहे. धापेवाडा सिंचन प्रकल्पाला पैशाची कमतरता पडणार नाही. पुढील तीन वर्षात आपल्या शासन काळात टप्पा-२ व ३ पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला सांगितले की, धापेवाडा हा सिंचन प्रकल्प फारच महत्वाचा आहे. यासाठी गरज पडल्यास मंत्रालयात सुद्धा बैठक घेऊन पैशाचे नियोजन कसे करता येईल व तीन वर्षात राहिलेले प्र्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे ना.महाजन म्हणाले.यावेळी आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले की, या क्षेत्रात हरीत क्रांती आणायची असेल तर हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. टप्पा-१ अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. तो यावर्षी पूर्ण होणार अशी अपेक्षा आहे. २३० मिटरचे काम राहिले आहे. ग्रॅव्हेटी फोर्सने गंगाझरीपासून पाणी जाणार आहे. ते कामसुद्धा पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आहे. परंतु टप्पा-२ पूर्ण होत नाही तोपर्यंत तिरोडा तालुक्याला पाणी मिळणार नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. इतका उशीर लागण्याचे कारण, हे जुने लेआऊट होते. चुरडी, चिखली, भिवापूर असे बोदलकशात पाणी टाकायचे होते. सर्व शेतकऱ्यांनी ना-हरकती दिल्या, परंतु लोधीटोला येथील शेतकऱ्यांनी ना हरकरती न दिल्याने लाईन बदलावी लागली. बिरसी फाट्यापासून रस्त्याच्या बाजूने एक लाईन चोरखमारापर्यंत व दुसरी बोलदकसापर्यंत लेआऊट लाईन तयार केली. चोरखमाराची व पंपहाऊसची मंजुरी प्राप्त झाली आहे. या पावसाळ्यात टेंडरसुद्धा होणार आहे. त्यामुळे टप्पा २ व ३ साठी निधी देणार, अशी घोषणा करण्याची विनंती आ.रहांगडाले यांनी ना.महाजन यांना केली. यावेळी माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्यांवर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक अधीक्षक अभियंता नार्वेकर यांनी केले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, माजी आ. भजनदास वैद्य, चतुर्भूज बिसेन, संदीप बघेले, डिलेश पारधी, डॉ.चिंतामन रहांगडाले, डॉ.वसंत भगत, संजयसिंह बैस प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)तिरोड्यात ढोलताशात मंत्र्यांचे स्वागतना.गिरीश महाजन यांचे तिरोडा शहरात आगमन होताच शहराच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्ष अजय गौर, न.प. सदस्य सलीम जवेरी, आनंद बैस, कृउबासचे मुख्य प्रशासक डॉ.चिंतामन रहांगडाले, भाऊराव कठाने, वसंत भगत, संजय बैस, राजेश गुणेरिया, तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन आणि ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. ना.गिरीष महाजन यांच्या टप्पा २ व ३ च्या पूर्ततेसाठी निधी कमी पडू देणार नाही या आश्वासनाने समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.