शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

३ तासांत साडेतीन लाख टिष्ट्वट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले आणि २२ डिसेंबर २००३ च्या शासन परिपत्रकानुसार १ जानेवारी २००४ पासून केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित करून कर्मचाऱ्यांमध्ये नवीन-जुने असा भेदभाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेचे आंदोलन : क्रांतीदिनी कर्मचाऱ्यांची पेन्शन क्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपुरी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे रविवारी (दि.९) क्रांतिदिनी जुनी पेन्शनची मागणी करणारे एक अनोखे आंदोलन पार पडले. यामध्ये राज्यभरातून लाखो कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला व जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी केली. या आंदोलनात जवळपास साडे तीन लाखांहून अधिक टिष्ट्ववट फक्त ५ तासांतच करण्यात आले.राज्यासह राष्ट्रीय पातळीवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील नॅशनल पेन्शन स्कीम रद्द करून जुनी पेन्शन स्कीम लागू करण्याची मागणी करण्यात आली. ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले आणि २२ डिसेंबर २००३ च्या शासन परिपत्रकानुसार १ जानेवारी २००४ पासून केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित करून कर्मचाऱ्यांमध्ये नवीन-जुने असा भेदभाव करण्यात आला आहे.त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पेन्शन बहाली अभियान व राज्य पातळीवर म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटनाद्वारे ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देशात टिष्ट्वटर वॉर माध्यमातून लाखो टिष्ट्वट व रिटिष्ट्वट करण्याचे आवाहन विजय बंधू व राज्य पातळीवर वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.देशात रविवारी (दि.९) क्रांतिदिनी दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळात लाखो टिष्ट्वट व रिटिष्ट्वट करून मृतक कर्मचाºयांच्या वारसाला कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ म्हणजे जुनी पेन्शन योजनेची मागणी करण्यात आली. यात ‘खासगीकरण भारत छोडो’ हा हॅशटॅग वापरून लाखो कर्मचाºयांनी जुनी पेन्शनची मागणी केली. कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, सफाई कामगार यांच्यासह सर्वच कर्मचाºयांनी आपल्या जीवाची काळजी न करता आपले कर्तव्य म्हणून आपापल्या परीने सेवा देण्याचे काम केले. त्यामध्ये अनेकांना संक्रमण देखील झाला तर काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले. असे असताना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन शासनाने त्यांना त्वरीत फॅमिली पेन्शन लागू करावी, जे कर्मचारी आपली संपूर्ण हयात शासन सेवा करतात त्यांना जुनी पेन्शन मिळावी, शासनाने लादलेली नवीन पेन्शन स्कीम ही बेभरवशाची असल्याने शासनाने मृतक कर्मचाऱ्यांविषयी सहानुभूती बाळगून त्यांच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन लागू करावी तसेच २००५ नंतर सेवेत रूजू सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्याध्यक्ष खांडेकर, राज्यसचिव गोविंद उगले, जिल्हाध्यक्ष राज कडव, जिल्हा सचिव सचिन राठोड यांच्या नेतृत्वात कोषाध्यक्ष प्रवीण सरगर, जितू गणवीर, मुकेश रहांगडाले, संतोष रहांगडाले, सुभाष सोनवणे, सचिन शेळके, जीवन म्हशाखेत्री, विलास लांजे, महेंद्र चव्हाण, सचिन धोपेकर, सुनील चौरागडे, क्रांतीलाल पटले, किशोर नवखरे, प्रवीण चौधरीसह सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.आतापर्यंत अनेक प्रकारे जुनी पेन्शन हक्क संघटनेने आंदोलन केले. परंतु ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन असल्यामुळे विशेष महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवशी राज्यभरातून हे टिष्ट्वटर आंदोलन करण्यात आले .वितेश खांडेकर, राज्याध्यक्षनवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांना अंधारात लोटणारी आहे. त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी शासनाने कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे.राज कडव, जिल्हाध्यक्ष