शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षापासून मिळत नाही तलावातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगामापासून शेतकरी वंचीत । खोलीकरण करण्याची पाच गावांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील मालगुजारी तलावाची निर्मिती शेतीचे सिंचन व पिण्यासाठी पाणी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. गेल्या ४५० वर्षापासून या तलावात लाखो टन गाळ साचला आहे. आतापर्यंत या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या वर्षी तलावात मृत साठाच उपलब्ध होता. त्यामुळे नवेगावबांध व परिसरातील गावात पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवले होते. गेल्या तीन वर्षापासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. या माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी नवेगावबांधवासी व निस्तार हक्क पाच गावातील रहिवाशांनी ग्रामसभेतून केली आहे.येथील तलाव १८ व्या शतकात सात पर्वतांच्या मधल्याभागात कोलू उर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी सिंचनासाठी तयार केले होते. या तलावाच्या बांधकामाचे अपूर्ण राहिलेले काम नवेगावबांधचे मालगुजार व कवळू पाटलाचे पूत्र सिताराम पाटील डोंगरवार यांनी त्यांच्या निधनानंतर पूर्ण केले. हा तलाव ६२५ मीटर लांब व ११.६० मीटर उंचीचा आहे. उपयुक्त साठवण क्षमता २९.५९७ दलघमी आहे. या तलावाच गट क्रमांक १२९२ असून याची आराजी १२२७.६६ हेक्टर आर एवढी आहे. हा तलाव ४५० वर्षे पूर्वीचा असून १९५६ मध्ये मध्यप्रदेश शासनाकडून महाराष्टÑ शासनाला हस्तांतरीत करण्यात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र ५६९८ हे.आर. असून १०००.३४ हे.आर. बुडीत क्षेत्र आहे. यापैकी ८२४ हेक्टर आर सध्या उपलब्ध क्षेत्र आहे. १७७० हेक्टर आर. लगतच्या जंगलातून या तलावात गाळ वाहून येत असतो. गेल्या शंभर वर्षांचाच जर विचार केला तर आजघडीला या जलाशयात चार लाख ४२ हजार ५०० घ.मी. गाळ साठला असावा, असा अंदाज गाळ तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे. पाण्याच्या साठ्याबरोबरच येथील तलावाशेजारील पर्यटन संकुलाचा विकास होण्याचा प्रश्नही तेवढाच ज्वलंत आहे.वर्षानुवर्षापासून तलावात गाळ साचला असल्यामुळे तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील चार वर्षापासून या तलावातून कालव्याद्वारे पाण्याचा उपसा होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकाला शेकडो शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. नवेगावबांध व परिसरातील पाण्याच्या समस्येसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जैवविविधता समितीची स्थापना केली गेली. यात तक्रारकर्त्यांचाही समावेश होता. पर्यावरण व वन्यजीवांचा कुठलाही तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला समितीत ठेवल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले गेले. पुन्हा तेच झाले. या समितीचा हेतूपुरस्सर आपल्याला हवा तसा अहवाल तयार करुन स्थानिक ग्रामवासीयांशी कसलीही चर्चा न करता सरपंच अनिरुद्ध शहारे बैठकीला नसताना देखील घाईगडबडीत त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. नवेगावबांधसह पाच गावांच्या ग्रामसभेचा कोणताही ठराव नसताना त्यांच्याशी चर्चा न करता या पाच गावतील नागरिकांच्या निस्तार हक्कांचा विचार न करता तलावाचे खोलीकरण व पर्यटन संकुलात विकासकामे करण्यात येऊ नये असा अहवाल वन्यजीव व वनविभागाने तयार करुन तलावाला संरक्षीत क्षेत्र घोषित केले हे नियमबाह्य आहे, असा आरोप फाऊंडेशनने केला आहे.

टॅग्स :Waterपाणी