शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

तीन वर्षापासून मिळत नाही तलावातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगामापासून शेतकरी वंचीत । खोलीकरण करण्याची पाच गावांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील मालगुजारी तलावाची निर्मिती शेतीचे सिंचन व पिण्यासाठी पाणी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. गेल्या ४५० वर्षापासून या तलावात लाखो टन गाळ साचला आहे. आतापर्यंत या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या वर्षी तलावात मृत साठाच उपलब्ध होता. त्यामुळे नवेगावबांध व परिसरातील गावात पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवले होते. गेल्या तीन वर्षापासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. या माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी नवेगावबांधवासी व निस्तार हक्क पाच गावातील रहिवाशांनी ग्रामसभेतून केली आहे.येथील तलाव १८ व्या शतकात सात पर्वतांच्या मधल्याभागात कोलू उर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी सिंचनासाठी तयार केले होते. या तलावाच्या बांधकामाचे अपूर्ण राहिलेले काम नवेगावबांधचे मालगुजार व कवळू पाटलाचे पूत्र सिताराम पाटील डोंगरवार यांनी त्यांच्या निधनानंतर पूर्ण केले. हा तलाव ६२५ मीटर लांब व ११.६० मीटर उंचीचा आहे. उपयुक्त साठवण क्षमता २९.५९७ दलघमी आहे. या तलावाच गट क्रमांक १२९२ असून याची आराजी १२२७.६६ हेक्टर आर एवढी आहे. हा तलाव ४५० वर्षे पूर्वीचा असून १९५६ मध्ये मध्यप्रदेश शासनाकडून महाराष्टÑ शासनाला हस्तांतरीत करण्यात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र ५६९८ हे.आर. असून १०००.३४ हे.आर. बुडीत क्षेत्र आहे. यापैकी ८२४ हेक्टर आर सध्या उपलब्ध क्षेत्र आहे. १७७० हेक्टर आर. लगतच्या जंगलातून या तलावात गाळ वाहून येत असतो. गेल्या शंभर वर्षांचाच जर विचार केला तर आजघडीला या जलाशयात चार लाख ४२ हजार ५०० घ.मी. गाळ साठला असावा, असा अंदाज गाळ तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे. पाण्याच्या साठ्याबरोबरच येथील तलावाशेजारील पर्यटन संकुलाचा विकास होण्याचा प्रश्नही तेवढाच ज्वलंत आहे.वर्षानुवर्षापासून तलावात गाळ साचला असल्यामुळे तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील चार वर्षापासून या तलावातून कालव्याद्वारे पाण्याचा उपसा होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकाला शेकडो शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. नवेगावबांध व परिसरातील पाण्याच्या समस्येसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जैवविविधता समितीची स्थापना केली गेली. यात तक्रारकर्त्यांचाही समावेश होता. पर्यावरण व वन्यजीवांचा कुठलाही तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला समितीत ठेवल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले गेले. पुन्हा तेच झाले. या समितीचा हेतूपुरस्सर आपल्याला हवा तसा अहवाल तयार करुन स्थानिक ग्रामवासीयांशी कसलीही चर्चा न करता सरपंच अनिरुद्ध शहारे बैठकीला नसताना देखील घाईगडबडीत त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. नवेगावबांधसह पाच गावांच्या ग्रामसभेचा कोणताही ठराव नसताना त्यांच्याशी चर्चा न करता या पाच गावतील नागरिकांच्या निस्तार हक्कांचा विचार न करता तलावाचे खोलीकरण व पर्यटन संकुलात विकासकामे करण्यात येऊ नये असा अहवाल वन्यजीव व वनविभागाने तयार करुन तलावाला संरक्षीत क्षेत्र घोषित केले हे नियमबाह्य आहे, असा आरोप फाऊंडेशनने केला आहे.

टॅग्स :Waterपाणी