शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांच्या जीवाचे मोलच नाही

By admin | Updated: July 14, 2016 01:51 IST

अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्याच्या दृष्टीने शहरात कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध तर कित्येक ठिकाणी

रस्त्यांवरील ‘खड्डे जैसे थे’ : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष गोंदिया : अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्याच्या दृष्टीने शहरात कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध तर कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला खड्डे (आऊटलेट) सोडण्यात आले आहेत. उघड्यावर पडून असलेले हे खड्डे आता अपघातांचे जनक ठरत असून या खड्यांमुळे कित्येकदा अपघात घडत आहेत. मात्र या सर्व प्रकारांकडे पालिकेचे सपशेल दुर्लक्ष दिसून येत आहे. या खड्यांवर झाकण टाकणे किंवा त्यांना बुजविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र पालिका यातही कमकुवत ठरत आहे. यातून पालिकेला शहरवासीयांच्या जीवाशी काहीच घेणे देणे नसून त्यांना लोकांच्या जीवाचे काही मोलच नसल्याचे आता शहरवासी बोलत आहेत. शहरातील अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांच्या मधोमध किंवा रस्त्यांच्या कडेला उघडे खड्डे (आऊटलेट) सोडण्यात आले आहेत. या खड्यांद्वारे नाल्यांची सफाई केली जाते. सफाई झाल्यानंतर या खड्यांवर लगेच झाकण लावून त्यांना बंद करणे ही सुद्धा पालिकेची जबाबदारी आहे. जेणेकरून या खड्यांत पडून किंवा खड्यांमुळे अपघात घडू नये. मात्र गोंदिया शहरातील स्थिती या विपरीत आहे. शहरात सोडण्यात आलेले खड्डे उघडेच दिसून येत आहेत. या खड्यांवर त्यांचे झाकण लावण्याचे साधे सौजन्य दाखविण्यासाठी पालिकेकडे वेळ नसल्याचे दिसते. एरवी ठिक आहे मात्र सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचते. पावसाच्या पाण्यात हे खड्डे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दिसत नाही. हा प्रकार एखाद्याच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या खड्यांमुळे कित्येक अपघातही घडले आहेत. यामुळे या खड्यांची त्वरीत व्यवस्था करण्याची मागणी शहरवासी करीत आहेत. मात्र पालिका निद्रीस्त असल्याने खड्डे तसेच उघड्यावर पडून आहेत. यातून पालिका या खड्यांत अपघात घडून लोकांच्या जीवावर बेतण्याची वाट बघत असावी अशा प्रतिक्रीया नागरीक व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी) पदाधिकारीही गप्प बसून नगर परिषद उपाध्यक्षांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देत या खड्यांवर झाकण बसवून घेण्याची गरज आहे. मात्र या दृष्टीने त्यांच्याकडून काहीच करण्यात आले नसल्याचे समजते. सफाई नंतर कर्मचाऱ्यांनी खड्यांवर झाकण बसविण्याचे त्यांनी निर्देश देणे अपेक्षीत आहे. मात्र येथील स्वच्छता विभाग किती तत्परतेने काम करतो हे देखील शहरवासी चांगल्याने जाणून आहेत. शहरवासीयांत रोष व्याप्त शहरातील रस्त्यांची स्थिती, कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था, डासांचा वाढता प्रकोप त्यात अपघातांना जनक ठरणारे हे खड्डे अशा नानाविध समस्यांवर पालिका काहीच करीत नसल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. शहरातील गचाळ वातावरणामुळे घराबाहेर पडणे आज कठिण झाले असल्याचे नागरीक बोलतात. आज नागरिकांत आतल्या आत पालिका प्रशासन व नगरसेवकांना घेऊन रोष निर्माण आहे. मात्र याचा स्फोट भविष्यात कधीही होणार यात शंका नाही.