शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

...तर २५ लाख क्विंटल धान होईल खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

गोंदिया : पूर्व विदर्भात मागील खरीप हंगामात १ कोटी लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले. मात्र, या धानाची भरडाईसाठी ...

गोंदिया : पूर्व विदर्भात मागील खरीप हंगामात १ कोटी लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले. मात्र, या धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने पाच जिल्ह्यात अद्याप २५ लाख क्विंटलवर धान उघड्यावर पडले आहे. आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून, हे उघड्यावरील धान खराब होण्याची शक्यता असून, यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पूर्व विदर्भात सर्वाधिक १० लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाकडून शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मागील वर्षी खरीप हंगामात पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या पाचही जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने १ कोटी लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. खरेदी करण्यात आलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाईनंतर सीमएआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र, गेल्या खरीप हंगामात धानाचे भरडाईचे दर, अपग्रेडेशन आणि तूट यावरून राईस मिलर्स आणि शासन यांच्यात तेढ निर्माण झाले होते. मात्र, यावर शासनाने त्वरित तोडगा काढला नाही. हा वाद पाच महिने सुरू राहिला. त्यातच आता पावसाळ्याला सुरुवात झाली. आतापर्यंत पूर्व विदर्भातील उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल धानापैकी केवळ १० ते १५ लाख क्विंटल धानाची उचल झाली आहे. उघड्यावर असलेल्या पूर्ण धानाची उचल करणे आता शक्य नसल्याचे या विभागाचे अधिकारी आणि राईस मिलर्सने सांगितले. त्यामुळे उघड्यावर असलेले २५ लाख क्विंटल धान खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शासन आणि प्रशासनाच्या धोरणाने लाखो क्विंटल धानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

.......

नियोजन फसल्याने रब्बीत शेतकरी अडचणीत

मागील वर्षी खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची शासनाच्या धोरणामुळे वेळेत उचल झाली. त्यामुळे लाखो क्विंटल धान या पाचही जिल्ह्यातील गोदामांमध्ये आणि उघड्यावर पडले आहे. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीसाठी जागा शिल्लक नाही. परिणामी यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली तरी रब्बीतील धान खरेदीचा तिढा सुटलेला नाही. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे.

............

कमिशनच्या वादात बारदाना खरेदी नाहीच

मागील वर्षी खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी १ कोटी बारदाना खरेदीची निविदा काढण्यात आली. निविदा एका कंत्राटाराला मंजूरदेखील झाली. पण, त्याच्याकडून प्रतिबारदाना ५ रुपये कमिशनची मागणी करण्यात आली. त्याने नकार दिल्याने खरीप हंगामात बारदाना खरेदीच झाली नसल्याची माहिती आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या बारदानात धान खरेदी करण्यात आली.