शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामाचे श्रेय घ्या; पण समस्याही दूर करा साहेब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

सालेकसा : आदिवासी महामंडळाची धान खरेदी गोदामाअभावी अडचणीत आली असता आदिवासी सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी विकास महामंडळाच्या समन्वयातून ...

सालेकसा : आदिवासी महामंडळाची धान खरेदी गोदामाअभावी अडचणीत आली असता आदिवासी सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी विकास महामंडळाच्या समन्वयातून शासनातील विविध घटकांच्या मदतीने तोडगा काढण्यात आला. रिकाम्या असलेल्या आश्रमशाळा व इतर इमारती धान संकलन करण्यासाठी उपयोगात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

यात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व संबंधित विभागाने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे आता देवरी उपविभागासह दोन्ही जिल्ह्यांत आदिवासी महामंडळाची धान खरेदी सुरू करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला; परंतु ही समस्या आम्हीच दूर केली, असे दावे-प्रतिदावे करीत श्रेय नेते मंडळी व लोकप्रतिनिधी घेत आहेत. धान खरेदी केंद्राच्या उद्‌घाटनांचा सपाटा सुरू केला आहे; परंतु याशिवाय अनेक मूळ समस्या आहेत. सेवा सहकारी समित्या आणि सर्वसामान्य शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील दोन वर्षांपासून धान खरेदी करणाऱ्या संस्थाचे कमिशन थकीत आहे. २०१४ पूर्वीचे शासनाने १३ वर्षांचे धान खरेदीचे कमिशन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सहकारी संस्था डबघाईस आल्यास आहेत. मागील खरीप हंगामातील धानाची उचल आतापर्यंत झाली नसल्याने पावसामुळे धान खराब होण्याची शक्यता आहे. धानाची भरडाई करण्यासंबंधी आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नसून उघड्यावर पडलेला धान केव्हा उचल करण्यात येईल, याची हमी कोणीच देऊ शकत नाही.

......

सहा महिन्यांपासून बोनसची प्रतीक्षा

धान विक्रीला सहा महिने लोटले तरी यंदाच्या बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. काही नेत्यांनी तर बोनस मिळवून देण्याची हमी देत आपली प्रसिद्धी करून घेतली व श्रेय लाटण्याची शर्यतच लावली; परंतु प्रत्यक्षात बोनसचा काही आता पत्ताच नाही. काही शेतकऱ्यांचे तर धानाचे मूळ चुकारेही मिळाले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झालेले आहेत.

.....

ऑनलाइनची मुदतवाढ करा

राज्यात निर्बंध सुरू असताना अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय येत नव्हते. त्यामुळे रबी धान विक्रीकरिता जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाइन होऊ शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाइनची मुदत वाढविण्याची गरज आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

......

आधी शेतकऱ्यांना अडचणी आणून ठेवणे, नंतर श्रेय लाटण्यासाठी काम केल्याचा देखावा करणे, असेच धोरण अवलंबिले जात आहे; परंतु आता शेतकरी शेतकऱ्यांनाही आता ही बाब कळून चुकली आहे, म्हणून आतातरी शेतकऱ्यांच्या थट्टा करणे थांबवावे.

- शंकरलाल मडावी, अध्यक्ष, आदिवासी सेवा सहकारी संस्था संघ, जि. गोंदिया.