शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

पोषण आहारातून तांदूळ, मूगडाळ, मटकीचा पुरवठा (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद करण्यात आल्या, परंतु शाळेतील १ लाख ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद करण्यात आल्या, परंतु शाळेतील १ लाख ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाचा पोषण आहार शाळेत न शिजविता मुलांना वाटप करून त्यांना घरी नेण्यास सांगण्यात आले. काेरोना संसर्गाला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवून हा शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील शहरी भागात ८ हजार ६०८ विद्यार्थी तर ग्रामीण भागातील १ लाख ५६३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देऊ नका. त्यांना अन्न-धान्य वाटप करा, अशा सूचना केल्या होत्या. या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी शाळांना सूचना दिल्या आहेत.

शाळा स्तरावर प्राप्त तांदूळ व धान्यादी वस्तू सुस्थितीमध्ये ठेवावे. शाळास्तरावर तांदूळ व धान्यादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी सदर तांदूळ व धान्यादी वस्तुवाटपाचे नियोजन करावे, पुरवठादाराकडून शाळांना शाळा स्तरावर प्राप्त होणाऱ्या तांदूळ, मूगडाळ आणि मटकीचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर करूनच स्वीकारावे, प्रत्यक्ष माल स्वीकारताना शालेय व्यवस्थापन समिती, पालक, आहार शिजविणारी यंत्रणा, बचत गट, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यापैकी एक आणि शाळेचे मुख्याध्यापक/ शिक्षक यांच्या समक्ष वजन करावे, प्रत्यक्षात वजन केलेल्या मालानुसारच संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाची पोहोच पुरवठादारांना देण्यात यावी.

बॉक्स

टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन टप्प्याटप्प्याने विद्यार्थी, पालकांना शाळेमध्ये बोलावून तांदूळ व धान्यादी वस्तूचे विहित प्रमाणात वाटप करावे, धान्यादी वस्तू व तांदूळ सुट्या स्वरूपात वितरित करण्यात येत असल्याने धान्यादी वस्तू व तांदूळ घेण्यासाठी कापडी पिशवी गोणीसोबत आणण्याबाबत विद्यार्थी पालकांना सूचित करण्यात आले. तांदूळ व धान्यादी मालाच्या वाटपाकरिता स्वयंपाकी/ मदतनीस यांची मदत घेण्यात आलीे. वाटप करण्यात आलेल्या तांदूळ व धान्यादी वस्तूची नोंद शाळा स्तरावर ठेवण्यात आली.

कोट

कोरोनाचा विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळेत अन्न शिजवून न देता, विद्यार्थ्यांना सरळ अन्नधान्य वाटप करा, असे शासनाच्या सूचना असल्याने शासनाच्या सूचनेनुसार अन्नधान्य वाटप करण्यात येते. फिजिकल डिस्टन्स ठेवूनच धान्यपुरवठा करण्यात येते.

जयप्रकाश जिभकाटे, लेखाधिकारी शालेय पोषण आहार

........

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी - १,०९,८१५

शहरी लाभार्थी - ८,६०८

ग्रामीण लाभार्थी - १,००,५६३