शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातून तांदूळ, मूगडाळ, मटकीचा पुरवठा (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद करण्यात आल्या, परंतु शाळेतील १ लाख ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद करण्यात आल्या, परंतु शाळेतील १ लाख ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाचा पोषण आहार शाळेत न शिजविता मुलांना वाटप करून त्यांना घरी नेण्यास सांगण्यात आले. काेरोना संसर्गाला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवून हा शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील शहरी भागात ८ हजार ६०८ विद्यार्थी तर ग्रामीण भागातील १ लाख ५६३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देऊ नका. त्यांना अन्न-धान्य वाटप करा, अशा सूचना केल्या होत्या. या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी शाळांना सूचना दिल्या आहेत.

शाळा स्तरावर प्राप्त तांदूळ व धान्यादी वस्तू सुस्थितीमध्ये ठेवावे. शाळास्तरावर तांदूळ व धान्यादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी सदर तांदूळ व धान्यादी वस्तुवाटपाचे नियोजन करावे, पुरवठादाराकडून शाळांना शाळा स्तरावर प्राप्त होणाऱ्या तांदूळ, मूगडाळ आणि मटकीचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर करूनच स्वीकारावे, प्रत्यक्ष माल स्वीकारताना शालेय व्यवस्थापन समिती, पालक, आहार शिजविणारी यंत्रणा, बचत गट, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यापैकी एक आणि शाळेचे मुख्याध्यापक/ शिक्षक यांच्या समक्ष वजन करावे, प्रत्यक्षात वजन केलेल्या मालानुसारच संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाची पोहोच पुरवठादारांना देण्यात यावी.

बॉक्स

टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन टप्प्याटप्प्याने विद्यार्थी, पालकांना शाळेमध्ये बोलावून तांदूळ व धान्यादी वस्तूचे विहित प्रमाणात वाटप करावे, धान्यादी वस्तू व तांदूळ सुट्या स्वरूपात वितरित करण्यात येत असल्याने धान्यादी वस्तू व तांदूळ घेण्यासाठी कापडी पिशवी गोणीसोबत आणण्याबाबत विद्यार्थी पालकांना सूचित करण्यात आले. तांदूळ व धान्यादी मालाच्या वाटपाकरिता स्वयंपाकी/ मदतनीस यांची मदत घेण्यात आलीे. वाटप करण्यात आलेल्या तांदूळ व धान्यादी वस्तूची नोंद शाळा स्तरावर ठेवण्यात आली.

कोट

कोरोनाचा विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळेत अन्न शिजवून न देता, विद्यार्थ्यांना सरळ अन्नधान्य वाटप करा, असे शासनाच्या सूचना असल्याने शासनाच्या सूचनेनुसार अन्नधान्य वाटप करण्यात येते. फिजिकल डिस्टन्स ठेवूनच धान्यपुरवठा करण्यात येते.

जयप्रकाश जिभकाटे, लेखाधिकारी शालेय पोषण आहार

........

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी - १,०९,८१५

शहरी लाभार्थी - ८,६०८

ग्रामीण लाभार्थी - १,००,५६३