शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

निसर्गाशी आत्मघाती थट्टा सुरूच

By admin | Updated: August 1, 2014 00:20 IST

मागील दोन दशकाच्या कालावधीत शेकडो पर्यटकांचा बळी घेऊन सुद्धा तालुक्यातील हाजराफॉल पर्यटन स्थळ दिवसेंदिवस दूर-दूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या

हाजराफॉल : बेलगाम पर्यटक, शासनाकडून अद्याप उपाययोजना नाहीतविजय मानकर - सालेकसामागील दोन दशकाच्या कालावधीत शेकडो पर्यटकांचा बळी घेऊन सुद्धा तालुक्यातील हाजराफॉल पर्यटन स्थळ दिवसेंदिवस दूर-दूरच्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु त्याच बरोबर येथे शासनाचे दुर्लक्ष व बेलगाम पर्यटक नेहमी येत असून येथे निसर्गाशी आत्मघाती थट्टा करीत असतात. मौज मस्तीच्या नावावर निसर्गाशी खेळण्याचा प्रकार सतत सुरूच असल्यामुळे आता हाजराफॉल आणखी किती पर्यटकांचा बळी घेणार आणि प्रशासन केव्हा जागे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा मुख्यालयापासून ५२ कि.मी. व सालेकसा तालुका मुख्यालयापासून १० कि.मी. अंतरावर असलेले हाजराफॉल (धबधबा) सतपुडा पर्वत रांगेच्या पूर्वी श्रृंखलेत दरेकसा पर्वत रांगेत स्थित आहे. घनदाट जंगल परिसर, शेकडो किलो मिटर पर्वत रांग यांच्या सानिध्यात वर्षानुवर्षे डौलाने उभे असलेले मोठमोठे वृक्ष व मुक्त विचरण करणारे विविध जातीचे तृणभक्षी व मांस भक्षी प्राणी अशी या हाजराफॉल परिसराची विशेषता आहे. वायु प्रदुषण व जलप्रदुषण यापासून दूर असलेला परिसर असून येथे भरपूर आॅक्सिजन प्राप्त होते. त्यातच उंच पहाडावरुन खाली पडणारा तीन नाल्यांचे पाणी व त्यातून निर्माण होणारे कारंजे मानवाला आकर्षित केल्या शिवाय राहत नाही. प्रत्येक स्त्री पुरुषांच्या मनाला आल्हादित करुन ठेवणारा धबधबा पाहण्यासाठी आता गोंदिया जिल्ह्यासोबतच दूर-दूर वरुन महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशासह इतर राज्यातील पर्यटक सुद्धा हाजरा फॉलला येऊ लागले. त्यामुळे मागील काही वर्षात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परंतु त्याच बरोबर येथे येणारे अनेक युवक-युवती निसर्गाशी थट्टा करीत असल्यामुळे त्यांना आपले प्राणही गमवावे लागले.यात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांना येथे घडणाऱ्या घटना व धोक्यांबद्दल माहिती नाही. तसेच काही युवक-युवती आपल्या तारुण्याच्या जोशात कुठे धोका आकहे याचाही भान ठेवीत नाही व निसर्गाशी थट्टा करणारी मौज मस्ती करीत असतात. या दरम्यान कोणत्याही दगडावर उभे राहून किंवा खोल पाण्यात जाऊन फोटो काढण्याचे जास्त शौकीन असतात. एकमेकाच्या गळ्यात हात घालून धोक्याच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढून घेण्यात जास्त रस घेणाऱ्या युवक-युवतींची संख्या खूप जास्त दिसते. परंतु अनावधानाने हे कृत्य त्यांच्या जीवावर बेतल्याशिवाय राहत नाही.सध्या पावसाळा जोरात असून हाजराफॉल धबधब्यावरुन संततधार पाणी पडत आहे. उंच पहाडावरुन तीन नाल्यांचे पाणी एकत्रित होऊन पडत असल्यामुळे खाली तलावात पाण्याचे मोठमोठे कारंजे निर्माण होत आहे व पाण्याचा धूर उडत आहे. हाजराफॉल परिसरात दूर दूर पर्यंत पाण्याचा धूर उडत असल्यामुुळे पर्यटकांच्या अंगाला त्याचा मऊ स्पर्श रोमहर्षक वाटत आहे. याचा आनंद लुटण्यासाठी रोज शेकडोच्या संख्येत पर्यटकांची रीघ लागलेली दिसत असते. सुटीच्या दिवशी तर हजारोंच्या संख्येत लोक हाजराफॉल बघण्यासाठी येत आहेत. यात काही पर्यटक येथील संभावित धोक्याच्या भान ठेवत सभ्यतेने या पर्यटन स्थळाचा पूरेपूर आनंद घेताना दिसतात. तर काही आपल्या तारुण्याच्या जोशात प्रकृतीशी खेळण्याचा दुस्साहस करीत असताना दिसतात. काल सुटीच्या दिवशी हाजराफॉल येथे भेट दिली असता असे दिसून आले की, या ठिकाणी अनेकांचा बळी गेला असून सुद्धा अनेक मौज मस्तीच्या नावावर जीव घेणे कृत्य करीत होते. वर पहाडावर चढून पाणी पडत असलेल्या ठिकाणी बाजूच्या दगडावर दगडाच्या टोकावर बसून फोटो काढणे, तसेच वरून दगड मारणे असे कृत्य करताना ते दिसले. तर खाली काही युवक बिनधास्त पणे तलावात आंघोळ करण्यासाठी प्रवेश करीत होते. वर पहाडावर पावसाळ्यात दगडावर शेवाळ जमले असते. तर काही ठिकाणी पावसामुळे मातीत दगडाची पकड घट्ट राहत नाही. अशावेळी अशा दगडांवर बसणे किंवा उभे राहणे खूपच धोक्याचे असते. आतापर्यंत येथे बुडून मरणाऱ्यांमध्ये वरुन पाय घसरुन खाली तलावात पडल्यामुळे व बुडून मृत्यू झाल्यांची संख्या जास्त आहे. तलावात तळात मोठमोठे दगड आहेत त्यामुळे पडणारा कोणीही सरळ दगडावर आपटतो आणि जीव गेल्याशिवाय राहत नाही. स्थानिक लोकं बाहेरच्यांना समजावून सांगूनही कुणी ऐकायला तयार नाही. जर असेच सुरू राहिले तर पुढेही सतत अपघात होत राहणार यात शंका नाही.