शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

मोरवाही येथील आंदोलनाची यशस्वी सांगता ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

गोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बौद्ध समाज बांधवांचे बुद्धविहाराच्या मागणीसाठी १२ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन ...

गोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बौद्ध समाज बांधवांचे बुद्धविहाराच्या मागणीसाठी १२ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शांततेत सुरू असतानाच सोमवारी (दि. ६) रात्री येथील काही लोकांनी आंदोलन मंडपावर हल्ला करीत नासधूस केली. परंतु पोलीस विभागाने चोख बंदोबस्त लावून गावगुंडांना आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यातच मंगळवारी (दि. ७) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे हजेरी लावत कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे तूर्तास २५ दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन समितीतर्फे मागे घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

मागील २५ दिवसांपासून येथे बुद्ध विहार बांधकामासाठी तसेच दोषी असलेल्या गावातील पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व राजू ब्राह्मणकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी येथील बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरू असतानाच आरोपी असलेल्या तिन्ही व्यक्तींनी आंदोलनस्थळी गणपती बसविण्याचे कारण पुढे करून आंदोलनकर्त्यांशी वादाला सुरुवात केली. त्यातच सोमवारी (दि. ६) पोळ्याच्या रात्री शे-दोनशे लोकांना जमवून त्यांनी आंदोलन मंडप उधळून लावण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांनासुद्धा धक्काबुक्की करीत सरपंच राधेश्याम भिमटे यांना मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. मात्र पुढे कोणताही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी संयमाची भूमिका घेत त्यांना पळवून लावले. त्यातच सदर प्रकरण पुढे वाढू नये व समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मंगळवारी (दि.७) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले.

यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, गटविकास अधिकारी खोटोले, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र खोब्रागडे, व स्वतः पोलीस अधीक्षक उपस्थित झाले. एवढी मोठी घटना घडूनही येथील ग्रामसेवक ललित सोनवणे हे बेपत्ता असल्याने त्यांच्या कार्यशैलीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केला.

--------------------------

लेखी आश्वासनाने आंदोलनाची सांगता

गावात आलेल्या अधिकाऱ्यांनी २ दिवसांत दोषी असलेल्या सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन व तिन्ही कंत्राटदारांवर कारवाईचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर येथील बौद्ध समाजबांधवांनी तूर्तास आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.