शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाला सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन ...

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन कापणीला आलेले धानाचे उभे पीक आडवे झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर संकट उभे ठाकले आहे. शनिवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे

आमदार विनोद अग्रवाल यांनी दौरा करून पाहणी केली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

याच विषया संदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेत आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली. सोबतच गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीबाबत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तोडगा न निघाल्यास शेतकरी बांधवांना खुल्या बाजारात धान विक्री करण्याची परवानगी देऊन ५०० रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त शेतकरी बांधवांना देण्याची मागणी केली. अनेक शेतकरी बांधवांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केला असून, त्यावर काहीच सुनावणी झाली नसल्याचे सुद्धा आमदार अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच, उपसरपंच, कृषी सहायक, तलाठी, चाबी संघटनेचे मनोहर लिल्हारे, नरेश येडे, मुरली नागपुरे, सरपंच लताबाई टेकाम, मधु मेश्राम, जीवन मेश्राम, नेतराम मेश्राम, युवराज ठाकरे, सुनील बेले, हंसलाल बघेले, राजकुमार दमाहे, मुन्नालाल माहुले, गणपत सहारे, तेजराम नागपुरे, मुन्नालाल नागपुरे, सरपंच तुलसी बोहने, उपसरपंच गिरजाशंकर बिरनवार, जयेंद्र लिल्हार उपस्थित होते.

.......

५० हजार रुपये प्रोत्साहन राशी केव्हा?

देवरी, नवेगाव, सोनबिहरी आणि जवळच्या अन्य गावांमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यासह, पाऊस आणि गारपिटीमुळे खूप मोठे नुकसान झाले. शेतकरीबांधव आधीच संकटात आहे. धानाच्या बोनसची रक्कम अजून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना ५० हजार रुपये बोनस राशी प्रोत्साहन पर देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. ती कधी मिळणार? असा सवाल आमदार विनोद अग्रवाल यांनी केला आहे.