शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

विद्यार्थ्यांनी ‘सेल्फ स्टडी’ करणे गरजेचे

By admin | Updated: May 22, 2014 01:16 IST

आजच्या पिढीला फेसबूक, व्हॉट्सअँप व मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे शाळा व ट्यूशन मध्ये झालेल्या अभ्यासा व्यतिरीक्त विद्यार्थी पुस्तकांना हात लावत नाही.

गोंदिया : आजच्या पिढीला फेसबूक, व्हॉट्सअँप व मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे शाळा व ट्यूशन मध्ये झालेल्या अभ्यासा व्यतिरीक्त विद्यार्थी पुस्तकांना हात लावत नाही. मात्र शाळा व ट्यूशन सोडून विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने अभ्यास करायला हवा. कारण सेल्फ स्टडी सवरेत्तम असते असे मत येथील साकेत पब्लीक स्कूलचे संचालक चेतन बजाज यांनी व्यक्त केले.

नुकतेच जाहीर झालेल्या सीबीएसई अभ्यासक्रमातील दहाव्या वर्गात साकेत पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांंनी विदर्भात अव्वल स्थान पटकाविले. शाळेच्या या घवघवीत यशा घेऊन बजाज यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. बजाज म्हणाले, मागील सात वर्षांपासून शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम आहे. दरवर्षी शाळेचा निकाल १00 टक्के लागतो. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांंनी विदर्भ गाठून शाळेचा किर्तीमान स्थापीत केला. या यशात खरी मेहनत विद्यार्थ्यांंची असून आम्ही आपले कर्तव्य पार पाडले.

शाळेतील विद्यार्थ्यांंकडे सुरूवातीपासूनच लक्ष देण्यात आले. विद्यार्थ्यांंना अभ्यासात येणार्‍या शंकांना दूर करण्यासाठी शिक्षकांनी २४ तास त्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे बिहार राज्यातून काही शिक्षक विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करण्यासाठी आणले आहेत. हे शिक्षक व स्वत: आम्हीही विद्यार्थ्यांंना प्रोत्साहीत करीत होतो. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांंना लागणारे वातावरण, साहीत्य व पुस्तका त्यांना उपलब्ध करवून दिल्याचे ते म्हणतात. बजाज म्हणतात, मिळालेले यश गैरवाची बाब आहे. मात्र ते टिकवून ठेवणे ही त्यापेक्षा जास्त महत्वाची बाब आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी तत्पर आहोत्. विद्यार्थ्यांंना संदेश देताना ते म्हणतात, शाळा व ट्यूशन पेक्षा सेल्फ स्टडी महत्वाची आहे. या व्यतिरीक्त दररोज पाच-सहा तास विद्यार्थ्यांंनी अभ्यास करायला हवा. यात आलेल्य शंका शिक्षकांकडून दूर करून घ्याव्यात यातून यशाचे मार्ग नक्कीच उघडणार. सोबतच पालकांनीही जागरूक रहावे. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहीत करणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांंवर अभ्यासाचा भार लादणे व भिती दाखविणे हे कार्य न करता प्रोत्साहीत करून अभ्यासाप्रती आकर्षीत करण्याची खरी गरज असल्याचे बजाज म्हणाले. (शहर प्रतिनिधी)