शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

गोंदिया : मागील वर्षी कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून यातून ते सावरत असतानाच आता दुसऱ्या लाटेने पुन्हा कहर केला ...

गोंदिया : मागील वर्षी कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून यातून ते सावरत असतानाच आता दुसऱ्या लाटेने पुन्हा कहर केला आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. अशातच शाळांकडून फीसाठी तगादा लावला जातो. सर्वसामान्यांची स्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मागील वर्षी कोरोनाने कहर केल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व काही विस्कळीत झाले होते. आता दुसऱ्या लाटेने अधिकच कहर केला असून पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे पुन्हा सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण होत आहे. असे असताना खासगी शाळांकडून कोणचाही विचार न करता फी साठी पालकांना तगादा लावण्याचे प्रकार घडतात. मागील वर्षीही असे झाले आहे. मात्र, आताची स्थिती लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांना निवेदन दिले. पंडित सुरेंद्र शर्मा, महेश तांडी, उमेश अग्रवाल, मुकेश जैन, सुरेश कुरील, अरूण जाधव, चंद्रकांत सणस, संजय कोडवानी, घनश्याम गुप्ता, राकेश लिल्हारे, सोमेश्वर पगरवार, पुष्पा ढाले, विजय शर्मा, हिरानंद ठकरानी आदींनी निवेदन दिले आहे.

----------------------------

सर्वोच्च न्यायालयाच्याही सूचना

शाळा बंद असल्यामुळे त्यांना शाळेत देण्यात येणाऱ्या सुविधांचा खर्चही बंद आहे. यामुळे शाळा संचालनाचा खर्च कमी झाला आहे. अशात विद्यार्थ्यांच्या फीमधून शाळांना फायदा होत आहे. मात्र, आजची स्थिती पाहता शाळांनी फी कमी करावी, असेही सूचविले आहे. मात्र, त्यानंतरही शाळांकडून फी वसूल केली जात आहे ही शोकांतिकाच आहे.

-----------------------------------

वीज बिल व मालमत्ता कर माफ करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मागील वर्षासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करणे कठीण असताना वीज बिल व मालमत्ता कर भरण्यासाठीही पैसे नाहीत. कित्येक नागरिक भाड्याच्या घरात राहतात व त्यांच्याकडे घरभाडे भरण्यासाठी पैसे नाहीत. ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली जाते त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे घराचे वीज बिल व मालमत्ता कर माफ करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.