शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाची वसुलीसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने दुसऱ्यांदा राज्यात लॉकडाऊन लावावा लागला आहे. कोरोनाची धास्ती घेत आता नागरिकांनी ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने दुसऱ्यांदा राज्यात लॉकडाऊन लावावा लागला आहे. कोरोनाची धास्ती घेत आता नागरिकांनी प्रवास टाळला असून, त्याचा फटका राज्य रस्ते परिवहन महामंडळाला बसत आहे. प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली असून, आगारांचे उत्पन्न शून्यावर आले आहे. अशात आता कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य खर्च भागविण्यासाठी महामंडळाने थकबाकीदारांकडे वसुलीसाठी धडपड सुरू केली आहे. महामंडळाची ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांच्याकडून पैसा काढणे आता महामंडळाला गरजेचे झाले असून, असे न झाल्यास त्याचा प्रभाव येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांच्या पगारावर पडणार यात शंका वाटत नाही. यामुळेच आता आगारांनीही त्यांच्याकडील थकबाकीच्या वसुलीसाठी थकबाकीदारांना पत्र पाठविण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, त्यांनीही थकबाकीच्या वसुलीवर आता जोर दिला आहे.

--------------------------

जिल्ह्यातील एकूण आगार - २

एकूण कर्मचारी - ४९३

सध्याचे रोजचे उत्पन्न - ००

महिन्याला पगारावर होणारा खर्च - १,१३,६१,२५६

----------------------

कुणाकडे किती थकबाकी ?

तहसील कार्यालय - १०,६९,३०२

---------------------------

...तर पगार होणे अवघड

प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने आगाराला काहीच उत्पन्न नाही. सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने त्याचा फटका महामंडळाला बसत आहे. हीच स्थिती राहिल्यास येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार निघणेही अवघडच दिसत आहे.

- संजना पटले, गोंदिया आगारप्रमुख

--------------------------------

कर्मचारी आर्थिक अडचणीत

प्रवासी वाहतूक ठप्प पडल्याने एस. टी. महामंडळाला उत्पन्नच नाही. मागील वर्षी हीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम पगारावर झाला होता. आता यंदा तेच दिवस परतून आल्यासारखे वाटते. हीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या काळात त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पडणार.

- सईद शेख, अध्यक्ष, कामगार संघटना

------------

कोरोनामुळे नागरिकांनी प्रवास बंदच केला आहे. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक बंद पडली आहे. परिणामी आगाराचे उत्पन्नाचे दारच बंद पडले आहे. याचा परिणाम महामंडळावर पडतो. पुढे ही अशीच स्थिती राहिल्यास कर्मचाऱ्यांचा पगार कसा निघणार, असा प्रश्न आहे.

- अशोक चौरसिया, सचिव, कामगार संघटना

----

कोरोनाचा धसका घेत नागरिकांनी प्रवास बंद केल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. सर्वत्र हीच स्थिती असून, महामंडळाला जबर फटका बसत आहे. यापुढे ही अशीच स्थिती राहिल्यास महामंडळाला कर्मचाऱ्यांचा पगार काढणेही कठीण जाणार, यंत शंका नाही.

- दिलीप बंसोड (वाहक, तिरोडा)