शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

वृद्ध कलावंतांची मानधनासाठी धडपड

By admin | Updated: October 20, 2016 00:23 IST

देशाने विज्ञान-तंत्रज्ञानात विशेष प्रगती केली असली तरी विशेषत: ग्रामीण भागात अंधश्रद्धा व अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणात आढळते.

तीन वर्षे लोटली : गैरलाभार्थ्यांना मिळतोय लाभ, खरे गरजवंत वाऱ्यावरकाचेवानी : देशाने विज्ञान-तंत्रज्ञानात विशेष प्रगती केली असली तरी विशेषत: ग्रामीण भागात अंधश्रद्धा व अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणात आढळते. त्यासाठी समाजप्रबोधन व जनजागृती केली जाते. या चळवळीत वृद्ध कलावंत मोलाची भूमिका बजावत आहेत. या वृद्धांना जडपणात मदत करता यावी याकरिता शासनाने कलाकार परिषदेच्या माध्यमाने मानधन देण्याची योजना आखली आहे. मात्र शेकडो कलावंतांचे आवेदने असतानाही त्यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे.वृद्ध कलाकार व साहित्यीक यांना मानधन देण्याची योजना आखल्याने या योजनेचा लाभ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुक्यातून शेकडो आवेदने देण्यात आली आहेत. मात्र आजही जे खरच लाभार्थी आहेत ते वाऱ्यावर असून गैरलाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याची विश्वस्त माहिती आहे.या योजनेचा लाभ मिळावा याकरिता तिरोडा तालुक्याचे तीन कलावंत, यात चैतराम धोंडू बिसेन (६४), निमगाव खुर्द येथील गणेशनाथ हरिनाथ नागोसे (राजपूत) व गवराबाई गणेशनारायण नागोशे यांनी १० एप्रिल २०१३ रोजी तिरोडा पंचायत समिती येथे प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एक वर्ष जि.प. समाजकल्याण गोंदियामध्ये धूळखात राहिला. त्रुटी दुरुस्तीकरिता पाठविल्यानंतर पुन्हा सादर करण्यात आले. मात्र आज तीन वर्ष पूर्ण झाले असून कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.बरबसपुरा येथील चैतराम बिसेन हे भजन, कीर्तनामधून जनजागृती करणारे राष्ट्रीय प्रचारक आहेत. तर गणेशनाथ हरिनाथ नागोसे (राजपूत) आणि पत्नी गवराबाई हे दोघेही भजन, कीर्तन, ग्रामसफाई, जनजागृती, वृक्षारोपण यासारख्या कार्यातून व प्रबोधनातून राष्ट्रीय कार्य करीत आहेत. विदर्भ शाहीर कलाकार परिषद पुणेद्वारे ही योजना राबवित असताना संबंधित जिल्हा परिषद समाजकल्याण लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यास अपयशी ठरत आहे. जि.प. गोंदियामध्ये हजारो लाभार्थ्यांचे आवेदन धूळ खात आहेत. गरीब परिस्थिीतून हजारो रुपये खर्च करुन आवेदन केले असताना त्यांचा कवडीचाही लाभ होताना दिसून येत नाही.विज्ञानाने प्रगती केली असताना आज अंधश्रद्धा, अशिक्षितपणा, अस्वच्छता आणि समाज विघटनाच्या समस्या दिसून येत आहेत. त्यांना दूर करण्याचा प्रयत्न हे कलावंत करीत आहेत. त्यांच्या कार्यातून समाजजागृती घडून येत आहे. प्रबोधनातून अनेकांमध्ये सुधार होत आहे.आपली शाहिरी व कलाकौशल्ये सादर करुन देशाच्या दुर्बलतेला दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या देशसेवेचा लाभ वृद्धापकाळात मिळावा, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. मात्र शासन यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी शासनाला बदनाम करीत आहेत. (वार्ताहर)कलेचा गंध नसलेले लाभार्थी कलाकारजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाद्वारे कलावंताना मानधनासाठी लाभार्थ्यांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने आपले प्रस्ताव निकाली काढण्यात आले नाही, असे अनेक अर्जदारांनी लोकमतला सांगितले. आजघडीला शेकडो लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय लोकांच्या जवळचे आहेत. ज्यांनी कधी कुठेही कला प्रदर्शित केली नाही, राष्ट्रीय व समाजप्रबोधनाच्या कार्यात सहभाग घेतला नाही, अशा अनेकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. जे वास्तविक गरजू आहेत ते आजही या योजनेचा लाभापासून वंचित आहेत.