शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

केशोरी येथील पथदिवे महिनाभरापासून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:34 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील सार्वजनिक विद्युत पथदिवे गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. परिणामी, गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील सार्वजनिक विद्युत पथदिवे गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. परिणामी, गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचे विद्युत बिल थकीत असल्याने विद्युत वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तेव्हापासून केशोरी गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील सार्वजनिक विद्युत पथदिव्यांची फक्त देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असून, विद्युत बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. जिल्हा परिषदेने सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याचे नाकारून आपली जबाबदारी झटकली आहे. विद्युत वितरण कंपनीने थकीत असलेल्या बिलाची मागणी करून, पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तेव्हापासून केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे बंद आहेत. शासनाने आदेश काढून ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून थकीत विद्युत पथदिव्यांच्या बिल भरण्याबाबत सूचना केल्या आहेत, परंतु येथील ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाची प्राप्त निधी गाव विकासाच्या बाबीवर खर्च करण्याचे नियोजन करून विनियोग केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे स्वनिधी उपलब्ध नाही. सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

............

शासनाने तो आदेश त्वरित मागे घ्यावा

गाव विकासासाठी खर्च होणारा निधी सार्वजनिक पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरण्यासंदर्भातील शासनाने आदेश काढून क्लिष्टता निर्माण केल्याचा आरोप तालुका सरपंच संघटनेचे प्रमुख नंदू पाटील गहाणे यांनी केला आहे. पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीने दिरंगाई केल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून अन्याय केला आहे. या प्रकारामुळे ग्रामसेवक व सरपंच यांच्या डोक्यावरील ताण वाढला आहे. शासनाने काढलेला आदेश त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.