गोंदिया : एसटीच्या कुटुंबात १ लाख २० अधिकारी, कर्मचारी आहेत. १६ हजार ५००च्यावर बसगाड्या आहेत. २५० डेपो आणि ५५० बसस्थानके असा वटवृक्ष असलेली एसटी खेड्यापाड्यातून मार्ग काढीत गावागावात पोहोचली. परंतु प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या खासगी वाहतुकीमुळे लोकवाहिनीला घरघर लागली आहे.राज्यातील एकूण लोकसंख्येचा विचार करता शहरापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरामध्ये देशी-विदेशी बनावटीच्या गाड्या सुसाट धावत असल्या तरी ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, आदिवासी एसटीवरच अवलंबून आहेत. महाराष्ट्रात या लोकवाहिनीची जून १९४८ मध्ये सुरुवात झाली. पाहता पाहता तो ग्रामीण भागातील एसटीचे महत्व लक्षात घेता एसटी टिकणेही काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आर्थिक, औद्योगिक, सामाजिक व राजकीय प्रगतीमध्ये एसटीच्या सिंहाचा वाटा आहे.डिझेलपासून एसटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तुंच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. त्याचा जबर फटका एसटीला बसत आहे. यामुळे एसटीला दररोज १ कोटी ३२ लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. परिणामी एसटी भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. अशावेळी प्रवास दरवाढीचा बोझा प्रवाशांवर पडतो. तिकीटावर १७.५ टक्के प्रवाशी कर शासनास द्यावा लागतो. प्रवासी कर वर्षासाठी ५०० कोटीपेक्षा जास्त असतो. प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी सर्वसामान्य प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सातत्याने एसटी प्रवासी भाड्यात होणारी अशा प्रवाशांना सहन करणे शक्य नाही. शासन १७.५ टक्के प्रवासी कर वसूल करून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावणे योग्य होणार नाही. (तालुका प्रतिनिधी)
खासगी वाहतुकीमुळे एसटीला घरघर
By admin | Updated: September 4, 2014 23:54 IST