शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजना सुरू करा

By admin | Updated: May 16, 2015 01:19 IST

गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे.

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यातच मागील तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेली ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू करण्यात न आल्याने पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. सदर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली तर नागरिकांना या भिषण पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल, अशी नागरिकांची मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर हे गाव आदिवासी दुर्गम भागातील गाव आहे. या गावात दरवर्षीच जानेवारी महिन्यापासून पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी भीषण टंचाई भाषत असते. भर उन्हाळ्यात गावातील बोअरवेल्स व विहिरींच्या पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावकऱ्यांवर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची पाळी येते. मात्र संबंधित प्रशासनाकडून या गावातील पाणी टंचाईकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे.गावकऱ्यांच्या विनंतीवरून २ एप्रिल २०१२ रोजी ग्रामसभेतील ठरावानुसार ग्रामीण पाणी पुरवठा योजनेला मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषद गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांना ठराव पाठविण्यात आले. त्यांच्याकडून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत बोरगाव-सुकपूर गावाला तांत्रिक मंजुरीनुसार ६ जुलै २०१२ रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र प्रशासन व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे त्या योजनेमार्फत अद्यापही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी जि.प. अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. तसेच निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, कार्यकारी अभियंता जि.प. गोंदिया, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करण्यासाठी तंमुसचे अध्यक्ष अशोक शेंडे, उपाध्यक्ष हेमराज ठाकूर, सदस्य विनराज मेश्राम, ऋषिपाल ठाकूर, मालीकराम ठाकूर, जगदीश मेश्राम अजीत गौंधर्य आदींनी मागणी केली आहे.सदर योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असून तीन वर्षांपूर्वीच काम बंद करण्यात आले होते. कोणतेही काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र तीन वर्षांचा कालखंड लोटल्यावरही काम अपूर्ण ठेवण्यामागे काय गौडबंगाल असावे, याबाबत गावकऱ्यांत चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत अर्ध्या गावात पाईप लाईन घालण्यात आले होते. मात्र पाणी पुरवठा सुरू न झाल्याने तीन वर्षांपासून ते तसेच होते. कालांतराने आता ही जुनी पाईप लाईन फुटली आहे. पाणी पुरवठ्यासाठी जुन्याच दोन टाक्या आहेत. मात्र ज्या विहिरीतून तिथे पाणी पोहोचते होणार आहे, त्या विहिरीवर अद्याप मोटार बसविण्यात आली नाही. या प्रकारामुळे बोरगाव-सुकपूरवासी अद्याप पिण्याच्या नळाच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)