शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पाणी पुरवठा योजना सुरू करा

By admin | Updated: May 16, 2015 01:19 IST

गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे.

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यातच मागील तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेली ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू करण्यात न आल्याने पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. सदर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली तर नागरिकांना या भिषण पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल, अशी नागरिकांची मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर हे गाव आदिवासी दुर्गम भागातील गाव आहे. या गावात दरवर्षीच जानेवारी महिन्यापासून पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी भीषण टंचाई भाषत असते. भर उन्हाळ्यात गावातील बोअरवेल्स व विहिरींच्या पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावकऱ्यांवर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची पाळी येते. मात्र संबंधित प्रशासनाकडून या गावातील पाणी टंचाईकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे.गावकऱ्यांच्या विनंतीवरून २ एप्रिल २०१२ रोजी ग्रामसभेतील ठरावानुसार ग्रामीण पाणी पुरवठा योजनेला मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषद गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांना ठराव पाठविण्यात आले. त्यांच्याकडून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत बोरगाव-सुकपूर गावाला तांत्रिक मंजुरीनुसार ६ जुलै २०१२ रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र प्रशासन व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे त्या योजनेमार्फत अद्यापही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी जि.प. अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. तसेच निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, कार्यकारी अभियंता जि.प. गोंदिया, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करण्यासाठी तंमुसचे अध्यक्ष अशोक शेंडे, उपाध्यक्ष हेमराज ठाकूर, सदस्य विनराज मेश्राम, ऋषिपाल ठाकूर, मालीकराम ठाकूर, जगदीश मेश्राम अजीत गौंधर्य आदींनी मागणी केली आहे.सदर योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असून तीन वर्षांपूर्वीच काम बंद करण्यात आले होते. कोणतेही काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र तीन वर्षांचा कालखंड लोटल्यावरही काम अपूर्ण ठेवण्यामागे काय गौडबंगाल असावे, याबाबत गावकऱ्यांत चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत अर्ध्या गावात पाईप लाईन घालण्यात आले होते. मात्र पाणी पुरवठा सुरू न झाल्याने तीन वर्षांपासून ते तसेच होते. कालांतराने आता ही जुनी पाईप लाईन फुटली आहे. पाणी पुरवठ्यासाठी जुन्याच दोन टाक्या आहेत. मात्र ज्या विहिरीतून तिथे पाणी पोहोचते होणार आहे, त्या विहिरीवर अद्याप मोटार बसविण्यात आली नाही. या प्रकारामुळे बोरगाव-सुकपूरवासी अद्याप पिण्याच्या नळाच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)