शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

धान खरेदी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

अर्जुनी-मोरगाव : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान खरेदी करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाध्य करीत ...

अर्जुनी-मोरगाव : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान खरेदी करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाध्य करीत आहे. मागील हंगामातील धानविक्रीचे बोनस अजूनही प्रलंबित आहे. कोरोनाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर नवे संकट उद्भवले आहे. अशात धानखरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी केली आहे.

खरीप हंगामाच्या तयारीची वेळ येऊन ठेपली असून मान्सून तोंडावर आहे. उत्पादित धान घरात ठेवायला जागा नाही. अद्याप जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी खासगी व्यापारी ठाण मांडून बसले आहेत. व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावात धानाची विक्री करावी लागत असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

मागील हंगामातील बोनस प्रलंबित आहे. कोरोनाचे संकट व धान खरेदीचा तिढा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा कठीण समयी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. गत हंगामातील धानाची उचल झाली नसल्याने गोदाम भरलेले आहेत. नव्याने खरेदी केलेला धान कुठे साठवायचा हा गंभीर प्रश्न आहे. शासनाने राईस मिलर्सशी वाटाघाटी करून गोदामे रिकामी करावीत. पूर्ण क्षमतेने जिल्ह्यातील शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.