शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

धान खरेदी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

अर्जुनी-मोरगाव : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान खरेदी करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाध्य करीत ...

अर्जुनी-मोरगाव : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान खरेदी करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाध्य करीत आहे. मागील हंगामातील धानविक्रीचे बोनस अजूनही प्रलंबित आहे. कोरोनाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर नवे संकट उद्भवले आहे. अशात धानखरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी केली आहे.

खरीप हंगामाच्या तयारीची वेळ येऊन ठेपली असून मान्सून तोंडावर आहे. उत्पादित धान घरात ठेवायला जागा नाही. अद्याप जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी खासगी व्यापारी ठाण मांडून बसले आहेत. व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावात धानाची विक्री करावी लागत असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

मागील हंगामातील बोनस प्रलंबित आहे. कोरोनाचे संकट व धान खरेदीचा तिढा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा कठीण समयी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. गत हंगामातील धानाची उचल झाली नसल्याने गोदाम भरलेले आहेत. नव्याने खरेदी केलेला धान कुठे साठवायचा हा गंभीर प्रश्न आहे. शासनाने राईस मिलर्सशी वाटाघाटी करून गोदामे रिकामी करावीत. पूर्ण क्षमतेने जिल्ह्यातील शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.