शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रब्बीतील धान खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST

बिरसी फाटा : जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धानाची मळणी सुरु ...

बिरसी फाटा : जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धानाची मळणी सुरु झाली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय धान खरेदी केंद्र १ मे पर्यंत सुरु करण्याची मागणी शेेतकऱ्यांनी केली आहे.

तिरोडा तालुक्यात खरीप हंगामासह रब्बी धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील खरीप हंगामातील खरेदी केलेले धान अजूनही विविध गोदामात पडून आहेत. धान भरडाईसाठी उचल न झाल्याने रब्बी धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकार आणि राईस मिलर्स यांच्या अडचणीवर त्वरित तोडगा काढून उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आधीच शेतकरी व कष्टकरी जनता व मजूर कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे हैराण झाले आहेत. हाताला काम नाही,खिशात पैसे नाहीत अशात उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. निसर्ग व शासनाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची हालत बिघडत चालली आहे. मात्र अशाही स्थितीत शेतकरी शेती करीत आहे. जे काही धानाचे उत्पादन झाले आले ते हमीभाव केंद्रात विक्री करुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. आता रब्बी धान पीक कापणीवर आले आहे. अशात खरीप हंगामात खरेदी करुन गोदामातील धान त्वरित उचल करुन उन्हाळी धान विक्रीसाठी हमीभाव धान खरेदी केंद्र १ मे पर्यंत सुरु करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे गोंदिया जिल्हा महासचिव लायकराम भेंडारकर यांनी केली आहे.