शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

रब्बीतील धान खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST

बिरसी फाटा : जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धानाची मळणी सुरु ...

बिरसी फाटा : जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धानाची मळणी सुरु झाली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय धान खरेदी केंद्र १ मे पर्यंत सुरु करण्याची मागणी शेेतकऱ्यांनी केली आहे.

तिरोडा तालुक्यात खरीप हंगामासह रब्बी धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील खरीप हंगामातील खरेदी केलेले धान अजूनही विविध गोदामात पडून आहेत. धान भरडाईसाठी उचल न झाल्याने रब्बी धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकार आणि राईस मिलर्स यांच्या अडचणीवर त्वरित तोडगा काढून उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आधीच शेतकरी व कष्टकरी जनता व मजूर कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे हैराण झाले आहेत. हाताला काम नाही,खिशात पैसे नाहीत अशात उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. निसर्ग व शासनाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची हालत बिघडत चालली आहे. मात्र अशाही स्थितीत शेतकरी शेती करीत आहे. जे काही धानाचे उत्पादन झाले आले ते हमीभाव केंद्रात विक्री करुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. आता रब्बी धान पीक कापणीवर आले आहे. अशात खरीप हंगामात खरेदी करुन गोदामातील धान त्वरित उचल करुन उन्हाळी धान विक्रीसाठी हमीभाव धान खरेदी केंद्र १ मे पर्यंत सुरु करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे गोंदिया जिल्हा महासचिव लायकराम भेंडारकर यांनी केली आहे.