शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

योजना घराघरांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: June 19, 2016 01:30 IST

शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांबद्दल मार्गदर्शन व त्याचा लाभ घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे.

पालकमंत्री : अर्जुनीच्या समाधान शिबिरात अधिकाऱ्यांना आवाहनअर्जुनी मोरगाव : शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांबद्दल मार्गदर्शन व त्याचा लाभ घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. या योजना आपल्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी येत्या १६ आॅगस्ट रोजी संपूर्ण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आगळावेगळा समाधान शिबिर घेण्यात येईल. याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.गुरुवारी महाराजस्व अभियानांतर्गत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित समाधान शिबिरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सी.एल. पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, परिविक्षाधीन वन विभागाचे अधिकारी राहुल पाटील (भावसे), जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, माजी आ. दयाराम कापगते, कृउबासचे सभापती काशिम जमा कुरेशी, अध्यक्ष नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, जि.प. व पं.स. चे सदस्य उपस्थित होते.बडोले पुढे म्हणाले, समाधान शिबिराची ही सुरुवात आहे. शासनाच्या संजय गांधी, श्रावणबाळ, नवीन शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब कल्याण, इंदिरा गांधी राष्ट्रीय जीवन निवृत्ती वेतन, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करणे, जमिनीचे आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना अधिवास व नॉन क्रिमिलिअर, प्रमाणपत्र, मोजणीची क प्रत व हैसीयत पत्र, मृद आरोग्य पत्रिका, नवीन वीज जोडणी, घरकुल प्रमाणपत्र आदी योजना गाव व घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. यासाठीच १६ आॅगस्टला शिबिराचे आयोजन केले आहे. लोकाभिमूख सरकार हे मुख्यमंत्र्याचे स्वप्न आहे. या माध्यमातून ते साकार होईल. धान खरेदीची उचल झाली नाही. त्याचे लवकरच निराकरण होईल. धान उचल करण्यासाठी आपण शासनाकडे भूमिका मांडणार आहोत. सेंद्रीय भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. लोकांमध्ये जागरुकता आल्याने हे परिणाम दिसून येत आहेत. दुबार धानपीक घेण्यापेक्षा भाजीपाल्यांची शेती करता आली तर लाभ होईल असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. बँकाच्या आडमूठ्या धोरणामुळे केंद्र शासनाच्या जनधन योजना, अटल पेन्शन योजना, विमा योजनांमध्ये व्यत्यय येतो. महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेत आहे. ते टाळण्यासाठी तलाव व वनसंवर्धनाची गरज आहे. १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करुन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात सारस आहेत. ही जिल्ह्याला लाभलेली देण आहे. त्यांचे संवर्धन करा. श्री पद्धतीचा लागवड करा. सेंद्रीय शेतीसाठी पुढाकार घ्या. जिल्हा वन व सिंचनाने समृद्ध आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाऐवजी उडीद, मूग व इतर कडधान्याची लागवड केली करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. डॉ. पुलकुंडवार यांनी गावे हागणदारीमुक्त करा. प्रत्येक कुटुंबात निदान एक झाड लावून त्यांचे संवर्धन करा व स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी दिलीप पाटील भूजबळ, रचना गहाणे, दयाराम कापगते यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी संगायो, पट्टेवाटप, सामूहिक दावा पट्टेवाटप, नवीन रेशनकार्ड, वितरण, नरेगा अंतर्गत सानुग्रह अनुदान वाटप, भात बियाणे व आरोग्य पत्रिका वाटप, तूर व धान बियाणे वाटप, विशेष घटक योजनेंतर्गत बैलजोडीसाठी अनुदान, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल अनुदान, पं.स. शेष निधीतून अपंगाना खुर्चीवाटप, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वितरण, दुधाळ जनावरे अनुदान वाटप, वन्यप्राणी हल्यात मृत्युमुखींच्या वारसांनाना लाभ देण्यात आला. मुंगली येथील मंजुळा बाबुराव राऊत यांचा वीज पडून मृत्यू झाला. वारसांनांना ४ लाख रुपये, कवठा येथील वासुदेव रामजी मडावी यांच्या वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने २५ हजार रुपये देण्यात आले. आत्महत्या करणारे शेतकरी रमेश गणपत पिल्लेवान महागाव व गजानन मारोती काळसर्पे यांच्या वारसानांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी तर आभार खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)खासदारांची अनुपस्थितीसमाधान शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून खा. प्रफुल्ल पटेल व खा. नाना पटोले यांची नावे आहेत. मात्र त्यांची कार्यक्रमात अनुपस्थिती होती. गावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे व भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषदेचे आ. राजेंद्र जैन यांची नावे निमंत्रण पत्रिकेत नव्हती. तालुका प्रशासनाने केलेली ही घोडचूक सर्वांना खटकणारी होती. तालुक्यातील सरपंचांना अगदी वेळेवर निमंत्रण दिल्याने अनेकांना शिबिरात सहभागी होता आले नाही. काही जिल्हा परिषद वा पंचायत समिती सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याच्या चर्चा आहे. मंचावर अधिकारी व केवळ भाजप कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती. त्यामुळे हा शासकीय मेळावा होता की भाजपाचा मेळावा हा प्रश्न अनेकांना पडला. या समाधान शिबिरात कसलेच समाधान झाले नाही. केवळ भाषणे व लाभार्थ्यांना योजनांचे धनादेश वाटप झाले. स्टॉलमधून योजनांची माहिती दिली जात होती. ही कामे कार्यालयातूनही केली जात आहेत. शिबिराद्वारे केवळ शासकीय निधीची वासलात लावली जात असल्याचा सूर व्यक्त केला जात होता.शिवसैनिकांशी सोयरसूतक नाहीशिवसेना हा भाजपाचा सत्तेतील मित्रपक्ष आहे. मंत्र्यांच्या शासकीय दौरा कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्त्यांना शिबिरासाठी बोलावण्याचे कुठलेच निर्देश नाहीत. याऊलट याच पत्रकात भाजप जिल्हा व तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांचा उल्लेख आहे. यावरुन भाजप-सेना हे सत्तेतील मित्रपक्ष असले तरी मतदारसंघात मात्र एकतेचे दर्शन घडताना दिसून येत नाही. या शिबिराबाबत तालुका प्रशासनातर्फे प्रचार व प्रसारच झाला नाही.