शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत रयत बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे व इतर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल उपलब्ध व्हावा या उद्देशातून शेतकरी ...

शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे व इतर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल उपलब्ध व्हावा या उद्देशातून शेतकरी ते थेट ग्राहक रयत बाजारामुळे जोडण्यात येत आहेत. या अभियानामुळे शेतकरी भाजीपाला ठोक विक्रेत्याला विकत न देता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दलालाला जाणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानुसार कारंजा येथील बाजारात तालुक्यातील ग्राम चुटीया, खमारी, वडेगाव, कासा, कारंजा येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळे, गूळ, काळा तांदूळ, काळा धान विक्रीकरिता आणला होता. या रयत बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, कृषी उपसंचालक विष्णू साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी रयत बाजाराला भेट देऊन उत्पादक शेतकरी व ग्राहकांशी संवाद साधला. उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार शेतमालाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले, तसेच ग्राम बिरसोला येथील प्रसिद्ध गुळाची खरेदी केली. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे, कृषी पर्यवेक्षक वामन टेंभुर्णे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन उपस्थित होते. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे आयोजन आत्माअंतर्गत करण्यात आले होते. बाजारासाठी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कलेवार, नंदनवार, कृषी पर्यवेक्षक मेंढे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी सहायक व कृषी मित्रांनी सहकार्य केले.