शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून संकटमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष जिल्हा किसान आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.९) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेेदनात, ई-पीक नोंदणी ॲपची क्लिष्ट अट तत्काळ रद्द करावी, खरीप हंगामात पावसाअभावी रोेवणी न झालेल्या शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, गादमाशीचा प्रादुर्भाव झालेल्या धान पिकाची पाहणी करून नुुकसानभरपाई देण्यात यावी, धडक सिंचन विहीर योजनेचे प्रलंबित चुकारे शेतकऱ्यांना तातडीने द्यावे, युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्यावर कारवाई करण्यात करून युरिया उपलब्ध करण्यात यावा, कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, थकीत कृषिपंपाची जोडणी धान पीक परिवक्व होईपर्यंत कापू नये व थकीत माफ करावे, रानडुकराच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्याना नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्या नमूद आहेत.

निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष केशव मानकर, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, गोपालदास अग्रवाल, खोमेश रहांगडाले, रमेश कुथे, भेरसिंग नागपुरे, नेतराम कटरे, संजय कुलकर्णी, संजय टेंभरे, भावना कदम, हनवत वट्टी, दीपक कदम, धनलाल ठाकरे, भाऊराव कठाने, साहेबलाल कटरे, अशोक लंजे, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, पंकज रहांगडाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------------

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्ह्यात यंदा पावसाने दगा दिला असून, सरासरीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी पडल्यामुळे धान पिकाची लावलेली रोपे गंभीर अवस्थेत आहेत. ही स्थिती बघता यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने चित्र दिसून येत आहे. अशात पंचनामे करून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणीही भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.