शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून संकटमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष जिल्हा किसान आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.९) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेेदनात, ई-पीक नोंदणी ॲपची क्लिष्ट अट तत्काळ रद्द करावी, खरीप हंगामात पावसाअभावी रोेवणी न झालेल्या शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, गादमाशीचा प्रादुर्भाव झालेल्या धानपिकाची पाहणी करून नुुकसानभरपाई देण्यात यावी, धडक सिंचन विहीर योजनेचे प्रलंबित चुकारे शेतकऱ्यांना तातडीने द्यावे, युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्यावर कारवाई करण्यात करून युरिया उपलब्ध करण्यात यावा, कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, थकीत कृषिपंपाची जोडणी धानपीक परिवक्व होईपर्यंत कापू नये व थकबाकी माफ करावी, रानडुकराच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी आदी मागण्या नमूद आहेत.

निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, गोपालदास अग्रवाल, खोमेश रहांगडाले, रमेश कुथे, भेरसिंग नागपुरे, नेतराम कटरे, संजय कुलकर्णी, संजय टेंभरे, भावना कदम, हनवत वट्टी, दीपक कदम, धनलाल ठाकरे, भाऊराव कठाने, साहेबलाल कटरे, अशोक लंजे, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, पंकज रहांगडाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

———————————————

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्ह्यात यंदा पावसाने दगा दिला असून, सरासरीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी पडल्यामुळे धानपिकाची रोपे गंभीर अवस्थेत आहेत. ही स्थिती बघता यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने चित्र दिसून येत आहे. अशात पंचनामे करून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणीही भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.