शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

आरोग्य सेवेची समस्या त्वरित सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST

देवरी : तालुक्यातील नक्षलग्रस्त आदिवासी, अतिदुर्गम व शंभर टक्के आदिवासी क्षेत्र असलेल्या म्हैसुली ग्रामपंचायत येथील दूरसंचार सेवा, बससेवा व ...

देवरी : तालुक्यातील नक्षलग्रस्त आदिवासी, अतिदुर्गम व शंभर टक्के आदिवासी क्षेत्र असलेल्या म्हैसुली ग्रामपंचायत येथील दूरसंचार सेवा, बससेवा व आरोग्य सेवा यांच्यासह इतर अनेक समस्येला घेऊन लोकजागृती मोर्चाचे ईश्वर कोल्हारे यांनी विभागीय आयुक्त व गडचिरोली परिक्षेत्र नागपूरचे पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

म्हैसुली ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतरसुद्धा या गावात कोणत्याही प्रकारची दूरसंचार सेवेची व्यवस्था नाही. त्यामुळे या गावात एखादे मोबाईल टॉवर उभाारणे अत्यंत गरजेचे आहे. या गावात दळणवळणाची सोय नाही. या गावातून बस सेवा उपलब्ध नसल्याने या गावाचा विकास होत नाही. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीअंतर्गत आरोग्य केंद्र नाही. येथील लोकांना आपल्या आरोग्याच्या उपचारांकरिता ८ ते १० कि. मी. पायी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. गंभीर आजारी रुग्णांना काहीही पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्ण हा उपचाराअभावी दगावतो. या गंभीर विषयाबाबत कोणताही अधिकारी व लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही. तरी या गावात आरोग्य केंद्र त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्फे वनविभागाकडून या गावात २०१७-१८ या वर्षात पूर्ण झालेल्या कामांच्या मजुरीची दहा लक्ष रुपये रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. संबंधित यंत्रणेच्या दिरंगाईमुळे येथील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

....

धानाच्या बोनसची रक्कम त्वरित द्या

शेतकऱ्यांना उन्हाळी धानाची रक्कम व खरिपातील धानाचे बोनस अद्यापही मिळाले नाही. ते त्वरित देण्यात यावे, २००५ मध्ये व्याघ्र प्रकल्प नवेगावबांध यांनी या गावातील लोकांचे विस्ताराचे हक्काची जमीन हिसकावून घेतली. त्या मोबदल्यात फक्त २०० हेक्टर जमीन दिलेले आहे. परंतु, आमच्या विस्तारासाठी १२०० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. तरी ती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली.