शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समाधान शिबिर भाजपचे की शासनाचे?

By admin | Updated: June 16, 2016 02:16 IST

तालुका प्रशासनातर्फे महाराजस्व अभियानांतर्गत १६ जून रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशासन हतबल : पाहुणे म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनाच प्राधान्यअर्जुनी-मोरगाव : तालुका प्रशासनातर्फे महाराजस्व अभियानांतर्गत १६ जून रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अनेक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्यामुळे हे शिबिर शासनाचे, की भाजपाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी झालेले शिबिर हे सुध्दा शहरात चर्चेचा विषय ठरले होते. या शिबिराचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार शिबिराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले हे करणार आहेत. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रफुल्ल पटेल, खा.नाना पटोले, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार, उपवनसरंक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, जि.प.च्या उपाध्यक्ष रचना गहाणे आदी उपस्थित राहणार आहेत.राजशिष्टाचाराच्या दृष्टीने गाव अथवा शहराचा प्रथम नागरिक हा शासकीय कार्यक्रमात कार्यक्रम पत्रिकेत असणे आवश्यक आहे. मात्र नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे यांना स्थान देण्यात आले नाही. जि.प.च्या अध्यक्षांचे नाव पत्रिकेत नाही, मात्र उपाध्यक्ष रचना गहाणे यांचे नाव आहे तर पं.स.च्या उपसभापती आशा झिलपे यांचेही नाव नाही.कार्यक्रम पत्रिकेत पं.स. सभापती व जि.प. उपाध्यक्ष यांची नावे आहेत. कारण ते भाजपाचे आहेत. हा राजशिष्टाचाराचा भंग असल्याची येथे चर्चा आहेत. केवळ खा. प्रफुल पटेल (राष्ट्रवादी) यांचे नाव आहे. त्यामुळे हे शिबिर शासनाचे की भाजपाचे हा शहरात चर्चेचा विषय आहे.(तालुका प्रतिनिधी)- हा तर राजशिष्टाचाराचा भंग?जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा असतो. शासकीय कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र त्यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसणे ही खेदाची बाब आहे. आ.राजेंद्र जैन हे गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे विधानपरिषद सदस्य आहेत. त्यांचेही नाव पत्रिकेत नाही. गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले असताना त्यांचे स्वागत कुडवाच्या सरपंचानी केले होते. हा एक राजशिष्टाचाराचा भाग असतो. मात्र अर्जुनी-मोरगावच्या नगराध्यक्षांचे यात नाव नाही, ही आश्चर्याची बाब असल्याचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी म्हटले. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जि.प.च्या कार्याची आढावा बैठक झाली. यात जि.प.अध्यक्षांना निमंत्रण नव्हते. जि.प.अध्यक्षांच्या अनुपस्थितीत जि.प.चा आढावा होणारच कसा? या सर्व बाबी राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या आहेत, असा आरोप जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.