शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा मुंडांच्या विचाराने समाजक्रांती घडवा

By admin | Updated: November 17, 2016 00:27 IST

इंग्रजांचे अधिपत्य स्विकार न करता मातृभूमीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्याचा लढा उभारून प्रजेच्या संरक्षणासाठी

संजय पुराम यांचे प्रतिपादन : रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुमदुमले आमगावआमगाव : इंग्रजांचे अधिपत्य स्विकार न करता मातृभूमीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्याचा लढा उभारून प्रजेच्या संरक्षणासाठी स्वत:चे प्राण देणारे वीर महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदर्श घडविला. इंग्रजांच्या अत्याचाराने खचलेल्या आदिवासी समाजाला एकत्रीत करुन क्रांती ज्योत पेटवली असे विचार आ. संजय पुराम यांनी व्यक्त केले.आमगाव येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते. आदिवासी विद्यार्थी संघटना व आदिवासी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची ५४१ वी जयंती निमित्त आमगावात रॅली व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती श्रावण राणा, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, हनवत वट्टी, सुमन पेंदोर, गुलाबराव धुर्वे, डॉ. श्रीकांत राणा, पं. स. सदस्या हरविला मडावी, मधुकर बिहारी, रमेश भलावी, नरेंद्र वाजपेई उपस्थित होते. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राणी दुर्गावती यांच्या तैलचित्रावर पुष्पांजली वाहून व दीप प्रज्वलन करण्यात आले. पुढे आ. पुराम म्हणाले की समाज विकासाचे पाऊल पुढे करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षण संघटना व संघर्षातून न्याय मिळविण्याची ताकद बिरसा मुंडा यांनी दिली. त्यांच्या विचाराने समाज क्रांती घडवा असे प्रोत्साहन केले.वाय.सी. भोयर यांनी आदिवासी बांधव या भूमीवरील मूलनिवासी आहेत. स्वातंत्र्य संघर्षातून निघालेला आपला समाज बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने पेटून उभा राहिला आहे. शिक्षण व विकास याचेद्वारे उघडे आहेत. याचा उत्तम लाभ मिळविण्यासाठी समाजाने मागे पडू नये. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी जल, जमीन व जंगल यावर प्रभूत्व निर्माण करुन ही संपदा कायम ठेवली. आपल्या संरक्षणाची जबाबदारी संघटन कौशल्याने पूर्ण करता येईल. ज्या बिरसा मुंडाने आदर्श घडविला त्यांच्या जयंती दिनाला राष्ट्रीय दिवस केंद्र व राज्य शासनाने घोषित करुन आदिवासींना सन्मान द्यावा, अशी मागणी केली.अध्यक्ष श्रावण राणा यांनी आदिवासींच्या आरक्षणावर गैरआदिवासींनी गदा घालू नये. शासनाने आदिवासींना मिळणाऱ्या सोईवर प्रभावीपणे नियंत्रण घालावे. आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक सोईवर गांभीर्याने दखल घ्यावी, विद्यार्थांच्या सुरक्षीततेसाठी अधिक उपाय योजना हाती घ्यावे असे मत व्यक्त केले. संचालन रमेश भलावी यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष संतोष पेंदोर, बाळा उईके, डॉ. श्रीकांत राणा, ऋषिश्वर राणे, मयाराम मेळे, राकेश परतेकी, सचिन उईके, सिमा उईके, यु.जी. फरदे व आदिवासी विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारी, सदस्य यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)