शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

बिरसा मुंडांच्या विचाराने समाजक्रांती घडवा

By admin | Updated: November 17, 2016 00:27 IST

इंग्रजांचे अधिपत्य स्विकार न करता मातृभूमीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्याचा लढा उभारून प्रजेच्या संरक्षणासाठी

संजय पुराम यांचे प्रतिपादन : रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुमदुमले आमगावआमगाव : इंग्रजांचे अधिपत्य स्विकार न करता मातृभूमीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्याचा लढा उभारून प्रजेच्या संरक्षणासाठी स्वत:चे प्राण देणारे वीर महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदर्श घडविला. इंग्रजांच्या अत्याचाराने खचलेल्या आदिवासी समाजाला एकत्रीत करुन क्रांती ज्योत पेटवली असे विचार आ. संजय पुराम यांनी व्यक्त केले.आमगाव येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते. आदिवासी विद्यार्थी संघटना व आदिवासी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची ५४१ वी जयंती निमित्त आमगावात रॅली व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती श्रावण राणा, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, हनवत वट्टी, सुमन पेंदोर, गुलाबराव धुर्वे, डॉ. श्रीकांत राणा, पं. स. सदस्या हरविला मडावी, मधुकर बिहारी, रमेश भलावी, नरेंद्र वाजपेई उपस्थित होते. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राणी दुर्गावती यांच्या तैलचित्रावर पुष्पांजली वाहून व दीप प्रज्वलन करण्यात आले. पुढे आ. पुराम म्हणाले की समाज विकासाचे पाऊल पुढे करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षण संघटना व संघर्षातून न्याय मिळविण्याची ताकद बिरसा मुंडा यांनी दिली. त्यांच्या विचाराने समाज क्रांती घडवा असे प्रोत्साहन केले.वाय.सी. भोयर यांनी आदिवासी बांधव या भूमीवरील मूलनिवासी आहेत. स्वातंत्र्य संघर्षातून निघालेला आपला समाज बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने पेटून उभा राहिला आहे. शिक्षण व विकास याचेद्वारे उघडे आहेत. याचा उत्तम लाभ मिळविण्यासाठी समाजाने मागे पडू नये. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी जल, जमीन व जंगल यावर प्रभूत्व निर्माण करुन ही संपदा कायम ठेवली. आपल्या संरक्षणाची जबाबदारी संघटन कौशल्याने पूर्ण करता येईल. ज्या बिरसा मुंडाने आदर्श घडविला त्यांच्या जयंती दिनाला राष्ट्रीय दिवस केंद्र व राज्य शासनाने घोषित करुन आदिवासींना सन्मान द्यावा, अशी मागणी केली.अध्यक्ष श्रावण राणा यांनी आदिवासींच्या आरक्षणावर गैरआदिवासींनी गदा घालू नये. शासनाने आदिवासींना मिळणाऱ्या सोईवर प्रभावीपणे नियंत्रण घालावे. आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक सोईवर गांभीर्याने दखल घ्यावी, विद्यार्थांच्या सुरक्षीततेसाठी अधिक उपाय योजना हाती घ्यावे असे मत व्यक्त केले. संचालन रमेश भलावी यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष संतोष पेंदोर, बाळा उईके, डॉ. श्रीकांत राणा, ऋषिश्वर राणे, मयाराम मेळे, राकेश परतेकी, सचिन उईके, सिमा उईके, यु.जी. फरदे व आदिवासी विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारी, सदस्य यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)