शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

कीर्तनातून समाजप्रबोधन आजही काळाची गरज

By admin | Updated: December 3, 2015 02:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. समाज प्रबोधनाचा वसा पुढे चालवत संत जैपालदास महाराज यांनी

पालकमंत्री बडोले : संत जैपालदास महाराज जन्मशताब्दी कार्यक्रमगोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. समाज प्रबोधनाचा वसा पुढे चालवत संत जैपालदास महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा नष्ट करुन गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य अखंडीतपणे केले. कीर्तनातून समाजप्रबोधन ही आजच्याही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.संत जैपालदास महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवनिमित्त तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे २९ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. महोत्सव आयोजन समिती व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधनात्मक किर्तन यावेळी झाले. कार्यक्र्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तथागत गौतमबुद्ध या लोकप्रिय चित्रपटाचे अभिनेते गगन मालिक, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, अखिल विश्वगायत्री परिवारचे जिल्हा समन्वयक मुकुंद भैरम, जिल्हा परिषद मनोज डोंगरे, पंचायत समिती सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, सरपंच देवेनबाई पारधी, उपसरपंच पुरणलाल भैरम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार यावेळी ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, तिरोडा तालुक्यातील उत्कृष्ट महिला बचत गट, उत्कृष्ट शेतकरी, गुणवंत विद्यार्थी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक चेतन भैरम यांनी तर प्रा.बबन मेश्राम यांनी संचालन केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला कवलेवाडा येथील ग्रामपंचायतचे सदस्य, गावकरी, युवक-युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रबोधनातून गावकरी भारावलेयाप्रसंगी खंजेरीवादक तुषार सूर्यवंशी यांनी खंजेरीवादनातून ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा, संविधानाच्या अभ्यासाबाबत जनजागृती, हुंडाप्रथा, शैक्षणिक जनजागृती, सर्वधर्म समभाव या विषयांवर जनप्रबोधन केले. विविध कार्यक्रमाच्या सादरीकरणातून जनजागृती करण्यात आली. स्पर्धा परीक्षाची तयारी, कौशल्य विकास कार्यक्रमावर आधारित मागदर्शन करण्यात आले.