शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

सहा गेले आणि दोनच आले

By admin | Updated: June 7, 2017 00:12 IST

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अगोदरच अव्यवस्थित असलेल्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण

कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण : पालिकेचा कारभार विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अगोदरच अव्यवस्थित असलेल्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण त्यात आता अधीकची भर घालत आहे. पालिकेतील महत्वपूर्ण विभागातील सहा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले आहे. तर त्यांच्या जागी फक्त दोनच कर्मचारी आले आहेत. सहा गेले आणि दोनच परत आल्याने पालिकेतील कारभार विस्कळीत झाला असून दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम पडत आहे. अजब-गजब कारभासाठी नगर परिषद तशीही ओळखली जाते. त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पालिकेचा कारभारही व्यवस्थित नाही. परिणामी कित्येक कामे करावयाची असतानाही कर्मचाऱ्यांअभावी ती कामे करता येत नाहीत. याचा फटका सुद्धा पालिकेला सहन करावा लागतो हे सुद्धा दिसून येते. तरिही पालिकेचे कामकाज कसेबसे एकाच्या खांद्यावर दुसऱ्याची जबाबदारी टाकून कसे तरी उरकण्याची प्रथा सुरू होती. यात उशीरा का होईना काही तर होत आहे याचा दिलासा पालिका प्रशासनाला होता. असे होत असतानाच मात्र पालिकेत कार्यरत राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. हे स्थानांतरण सुध्दा तडफाफडकी स्वरूपाचे होते व कर्मचाऱ्यांना त्वरीत नव्या जागी रूजू होण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. त्यामुळे स्थानांतरण झालेले सहा कर्मचारी आदेशानुसार आपापल्या ठिकाणी रुजू झाले. सहा कर्मचारी येथून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त पडून होत्या त्याचा परिणाम ते बघत असलेल्या कामकाजावर पडत आहे. असे असताना मात्र सहा कर्मचाऱ्यांच्या जागांवर फक्त दोनच कर्मचारी पालिकेत रूजू झाले आहेत. सहा गेले आणि दोनच आले अशी स्थिती पालिकेत आहे. विशेष म्हणजे स्थानांतरण झालेल्या या कर्मचाऱ्यांमुळे ते निगडीत असलेल्या विभागाचा कारभारच विस्कटला आहे. अशात त्याचा परिणाम नगर पालिकेच्या कामकाजावरही पडणार आहे. त्यामुळे आता रिक्त पडून असलेल्या त्यांच्या जागांवर नवे कर्मचारी आल्यावरच कारभार सुरळीत होण्याचे म्हणता येईल. मात्र या कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणामुळे पालिकेतील मॅकेनिक, प्रधानमंत्री आवास, कोर्ट, विद्युत, बांधकाम यासह अन्य काही विभागांचा कारभार विस्कळीत झाला आहे. बांधकाम विभाग वाऱ्यावर नगर पालिकेतील बांधक ाम विभागाचा तसाही कुणी वाली नव्हता. त्यात आता कावडे व कोरडे यांचे स्थानांतरण झाल्याने विभागात कार्यरत तीन कंत्राटी अभियंत्यांच्या भरवशावर विभागाचा कारभार आला आहे. कारण, नगर परिषद अभियंत्याचा प्रभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बारई यांच्याकडे आहे. त्यात कावडे व कोरडे कसे तरी कारभार चालवित होते. आता मात्र त्यांचेही स्थानांतरण झाल्याने विभागात कंत्राटी अभियंता सोडून अन्य कुणीच उरले नाहीत. विशेष म्हणजे कोर्ट एजंट म्हणून काम बघत असलेले लिमये यांचेही स्थानांतरण झाल्याने आता कोर्टाचे प्रकरण बघायला कुणीही नाही. कोर्टाचे कामकाज सांभाळणे साधारण काम नसल्याने आता कुणाकडे हे काम द्यावे असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.