शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सिरेगावबांध पंचायत समिती सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्यातील एकमेव ग्रामपंचायत सिरेगावबांधला सन २०२० - २१चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, ...

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्यातील एकमेव ग्रामपंचायत सिरेगावबांधला सन २०२० - २१चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर दुसऱ्यांदा राज्यस्तरीय चाईल्ड फ्रेंडली पुरस्कारसुद्धा मिळाला. केंद्र शासनाचा चाईल्ड फ्रेंडली पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील सिरेगावबांध एकमेव ग्रामपंचायत आहे.

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या स्वाक्षरीने सन २०१९ - २० या वर्षाचा पुरस्कार दिनांक २४ एप्रिलला गोंदिया येथील जिल्हा परिषद पंचायत राज विभाग येथे व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम सिरेगावबांधचे सरपंच, इंजिनीयर हेमकृष्ण संग्रामे उर्फ दादा पाटील, ग्रामसेवक टी. टी. निमजे, लोकपाल गहाणे यांच्याकडे हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला आहे.

अर्जुनी - मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजू वलथरे, टी. टी. निमजे व पंचायत समितीचे इतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण सहकार्य राहिले आहे. हा पुरस्कार गावातील लहान बालके त्यांचा विकास, त्यांच्या शाळेत सर्व सोयी सुविधा पुरविणे, गावातील कोणतेही बालक कुपोषित राहणार नाही, यासाठी ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवत असून, बालक जन्माला येण्यापासून त्याला मूलभूत सुविधा पुरविणे, त्याच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना पोषण आहार देण्याचे कार्य करीत आहे. संपूर्ण सिरेगाव बांधवांशी जनता एकजुटीने गावाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असतात. कोणीही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याचीसुद्धा काळजी घेतली जाते.

.....

कोट

बालकांचा शैक्षणिक, शारीरिक, बौद्धिक विकास होण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडीतील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी सदैव कार्यरत असतात. सिरेगावबांध ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. आम्ही यानंतरसुद्धा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व संपूर्ण गाव विकासासाठी नेहमीच झटत राहू.

- हेमकृष्ण संग्रामे, सरपंच, सिरेगावबांध

......

हा तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव

सिरेगावबांध ग्रामपंचायतीला यापूर्वी केंद्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुका जिल्हा नागपूर विभागातून पुरस्कार आणि केंद्र शासनाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, चाईल्ड फ्रेंडली पुरस्कार मिळालेले आहेत. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीचे सरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे उर्फ दादा पाटील यांचे नेतृत्व, उपसरपंच हिरालाल मसराम व ग्रामपंचायत सदस्य यांची सतत धडपड मोलाची आहे.