शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

महोदय, सुपरफास्ट रेल्वे कशाला? सामान्यांची पॅसेंजर सुरूकरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. अशातच दिलासा म्हणून गोंदिया-बल्लारशा व ...

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी : कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. अशातच दिलासा म्हणून गोंदिया-बल्लारशा व जबलपूर ही सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. पण या गाडीचा या परिसरातील प्रवाशांना काहीच उपयोग नाही. म्हणून रेल्वे प्रशासनाला सर्वसामान्य जीवन जगणारा महोदय, सुपर रेल्वे कशाला? सामान्य नागरिकांची पॅसेंजर रेल्वे सुरू करा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

कोरोनाचा धोका कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. कोरोनाने अनेक दारिद्र्यरेषेखालील व सामान्य नागरिकांचे जगणे हलाखीचे केले आहे. अशातच कामासाठी बाहेर पडणारी जनता ही गरीब आहे, अशा परिस्थितीत जीवन जगताना जनतेला अनेक संकटांना तोंड देत जगावे लागते. प्रशासनाने रेल्वे ही सर्व सामान्य स्तरावर जगणाऱ्या नागरिकांसाठी पॅसेंजर व लोकल अशा रेल्वेची सुविधा केली. गोंदिया-वडसा-नागभीड-बल्लारशा ही पॅसेंजर अनेक वर्षांपासून धावत होती. ती कोरोनाने बंद झाली. सुरूच करायची होती, तर पॅसेंजर सुरू करावी. सुरू झालेली सुपरफास्ट एक्स्प्रेस ही अजिबात कामाची नाही, असा खडाजंगी सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सवलती, योजनांसह पुरेशा सुविधा या सामान्यांच्या हक्काच्याच आहेत व असतात, हे तर हे प्रशासनाने जाणून घ्यावे.

.....

सामान्यांसाठी रेल्वेच उत्तम

सध्या मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दळणवळणाच्या साधनापैकी केवळ रेल्वे परवडण्यासारखी आहे. प्रवासही सुखकारक होतो. म्हणून रेल्वेच आम्हासाठी उत्तम आहे, असे प्रवासी सांगतात.

-----------------------

आम्हाला वडसा, ब्रम्हपुरी महाविद्यालयांत जाण्यासाठी आजही सोयीचे साधन नाही. बस वेळेवर येत नाही, तर तिकीटसुध्दा अधिक असल्याने ते परवडत नाही. म्हणून पॅसेंजर सुरू करावी.

- अंजली दिरबुडे, विद्यार्थिनी, चान्ना

===========

तालुक्याच्या व शहराच्या ठिकाणी जायला बस किवा इतर साधने परवडत नाही. आपले काम करून येणे-जाणे सोयीचे नाही, भाजीपाला घेण्यासाठी लांब जाणे फायदेशीर नाही.

- डी. बी. कांबळे, भाजीपाला व्यावसायिक

------------

नागरिकांसाठी पॅसेंजर सुरू करावी. जनता आता हतबल झाली आहे. म्हणून पॅसेंजर व लोकल सुरू करण्याची मागणी बाराभाटी, येरंडी-देवलगाव, कवठा, डोंगरगाव, बोळदे, ब्राम्हणटोला, चापटी, सुरगाव, पिंपळगाव, कुंभीटोला या गावांतील गावकरी करीत आहेत.