शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आम्ही गढूळ पाणी प्यायचे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

बाराभाटी : मानव पाण्याविना कसा जगेल, पाण्याशिवाय माणसाचे काहीच होत नाही. अशाही काळात धमदीटोला गावात पिण्याच्या पाण्याची योग्य सोयच ...

बाराभाटी : मानव पाण्याविना कसा जगेल, पाण्याशिवाय माणसाचे काहीच होत नाही. अशाही काळात धमदीटोला गावात पिण्याच्या पाण्याची योग्य सोयच नाही. गावात एकच बोअरवेल असून, त्या बोअरवेलचे पाणी हे गढूळच येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.

धमदीटोला गावात मागील अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या कायम आहे. गट ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे लक्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय केली नाही. गावात आदिवासी समाजातील नागरिक अधिक आहेत. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनिधींचे सुद्धा या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. गावातील एकमेव बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्यामुळे महिलांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून पाणी आणावे लागत आहे, तर कधी शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पाण्याची सोय करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

.........

टँकरने पाणीपुरवठा करा

मागील काही दिवसांपासून धमदीटोला येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. गावात एकमेव असलेल्या बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

....

ग्रामपंचायतीने आमच्या सर्व समस्या दूर कराव्या

या गावात अनेक समस्या प्रलंबित आहेत. आदिवासी समाजाचा फायदा घेऊ नये. भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल न करता गावकऱ्यांना किमान मूलभूत सुविधा तरी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी येथील गावकऱ्यांची मागणी आहे.

.......

अनेक उन्हाळे व पावसाळे पाहिले; पण शुद्ध पाण्याचा पुरवठा अद्यापही करण्यात येत नाही. गावातील पाणी पुरवठ्याच्या समस्येची कुणीच दखल घेतली नाही.

- अरुण उईके, नागरिक धमदीटोला

.....

ग्रामपंचायत लक्ष देत नाही. योजनांचा लाभही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे; पण प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही.

-राजाराम नैताम, गृहस्थ धमदीटोला