शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:53 IST

राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देविद्यार्थिनींची मागणी : आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.कालीमाटी ते आमगाव दरम्यान शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. पण सकाळपाळीत तासनतास बस उशिरा येते. तसेच सायंकाळी उशिरा सोडली जाते. सदर प्रकरण अनेक महिन्यांपासून सुरु आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थिनींत चांगलाच रोष खदखदत आहे. यातूनच शनिवारी (दि.१) विद्यार्थिनींनी आपला रोष व्यक्त केला.आमगाव बस स्थानकातून मानव विकास योजनेंतर्गत २६३, अहिल्याबाई होळकर ३३६ व इतर ७७२ पासधारक दररोज प्रवास करतात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि प्रतयेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मानव विकास, अहिल्याबाई होळकर आदी योजनेतून इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थिनींना निशुल्क किंवा अल्पदरात पास तयार करुन दिली जाते. राज्य शासनाच्या राज्य परिवहन विभागाद्वारे विविध योजना चालविल्या जातात. पण प्रशासनाच्या हेकेखोर पणामुळे व दुर्लक्षीत यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासकीय योजना कागदावरच व मंदगतीने धावत असल्याचे दिसून येत आहे.विलंबाने वाहन सुटत असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. आपल्याकडे तक्रार आली असून या संबंधात आगार प्रमुखांशी बोलणी केली आहे. प्रशासनाने या संबंधी दखल घ्यावी, अन्यथा चक्का जाम आंदोलनाची तयारी आहे.-सुरेश हर्षेजिल्हा परिषद सदस्य..........................बस स्थानकातून वेळेवर बस सोडण्याचे नेहमी प्रयत्न असते. पण आगारात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एखादा चालक-वाहक सुटीवर असल्यावर तिढा निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता यंत्रणा प्रयत्नशिल आहे.-एस.एस. कोसरकरवाहतूक नियंत्रक

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ