शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:53 IST

राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देविद्यार्थिनींची मागणी : आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.कालीमाटी ते आमगाव दरम्यान शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. पण सकाळपाळीत तासनतास बस उशिरा येते. तसेच सायंकाळी उशिरा सोडली जाते. सदर प्रकरण अनेक महिन्यांपासून सुरु आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थिनींत चांगलाच रोष खदखदत आहे. यातूनच शनिवारी (दि.१) विद्यार्थिनींनी आपला रोष व्यक्त केला.आमगाव बस स्थानकातून मानव विकास योजनेंतर्गत २६३, अहिल्याबाई होळकर ३३६ व इतर ७७२ पासधारक दररोज प्रवास करतात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि प्रतयेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मानव विकास, अहिल्याबाई होळकर आदी योजनेतून इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थिनींना निशुल्क किंवा अल्पदरात पास तयार करुन दिली जाते. राज्य शासनाच्या राज्य परिवहन विभागाद्वारे विविध योजना चालविल्या जातात. पण प्रशासनाच्या हेकेखोर पणामुळे व दुर्लक्षीत यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासकीय योजना कागदावरच व मंदगतीने धावत असल्याचे दिसून येत आहे.विलंबाने वाहन सुटत असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. आपल्याकडे तक्रार आली असून या संबंधात आगार प्रमुखांशी बोलणी केली आहे. प्रशासनाने या संबंधी दखल घ्यावी, अन्यथा चक्का जाम आंदोलनाची तयारी आहे.-सुरेश हर्षेजिल्हा परिषद सदस्य..........................बस स्थानकातून वेळेवर बस सोडण्याचे नेहमी प्रयत्न असते. पण आगारात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एखादा चालक-वाहक सुटीवर असल्यावर तिढा निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता यंत्रणा प्रयत्नशिल आहे.-एस.एस. कोसरकरवाहतूक नियंत्रक

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ