शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

लॉक-अनलॉकच्या गोंधळात शटर अर्ध्यावर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने काही निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. याअंतर्गत ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने काही निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. याअंतर्गत दुपारी २ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचे व शनिवारी आणि रविवारी संपूर्ण बंदचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शनिवारी (दि. ५) अवघ्या शहरातच बंदीचे आदेश धुडकावून दुकाने सुरू असल्याचे दिसले. यामुळे लॉक की अनलॉक या गोंधळात व्यापारी व ग्राहक होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने मागील सुमारे दीड-दोन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून अन्य दुकाने पूर्णपणे बंदच होती. परिणामी एवढ्या काळात झालेल्या नुकसानीने व्यापारी चांगलेच अडचणीत आले आहेत. सुदैवाने आता जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट पाय पसरत असून, बाधितांची टक्केवारी नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने अनलॉकच्या यादीत जिल्ह्याचा समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वच दुकानांना आता दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे; तर शनिवारी व रविवारी सर्वच बंद राहणार, असेही आदेश काढण्यात आले आहेत.

शिथिलतेचे आदेश लागू झाल्यानंतर पहिल्याच शनिवारी (दि. ५) मात्र आदेशाची धुडकावणी झाल्याचे शहरात दिसून आले. शनिवारी पूर्ण बंद असतानाही शहरात सर्वच काही सुरू असल्याचे दिसले. त्यात बाजारात नेहमीप्रमाणे सर्व दुकाने सुरू होती व नागरिकांची गर्दीही तेवढीच दिसली. दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी आपला व्यापार करून घेतला व त्यामुळे जिल्हा प्रशासनाला शनिवारी बंदचे आदेश आहेत, याचा विसर पडला की काय, असेच वाटू लागले.

--------------------------

पोलीस गाडी आल्यावर केली दुकाने बंद

शनिवारी दुपारी १ वाजता पोलिसांची गाडी व त्यांनी व्यापाऱ्यांना माईकवरून दुकान बंद करण्यास सांगितल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर खाली पाडले. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे, यात शंका नाही.

-----------------------------------

नियमांकडे दुर्लक्ष नकोच

मागीलवर्षीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी मनमर्जीपणे व्यापार केला. यात मात्र त्यांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आदी नियमांची धुडकावणी केली. परिणामी जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता. त्याचे परिणाम कित्येक व्यापाऱ्यांनाही भोगावे लागले होते. आता सुदैवाने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र मागील वर्षी झालेली चूक पुन्हा होऊ नये एवढे भान मात्र नक्कीच बाळगणे गरजेचे आहे.