शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लॉक-अनलॉकच्या गोंधळात शटर अर्ध्यावर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने काही निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. याअंतर्गत ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने काही निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. याअंतर्गत दुपारी २ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचे व शनिवारी आणि रविवारी संपूर्ण बंदचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शनिवारी (दि. ५) अवघ्या शहरातच बंदीचे आदेश धुडकावून दुकाने सुरू असल्याचे दिसले. यामुळे लॉक की अनलॉक या गोंधळात व्यापारी व ग्राहक होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने मागील सुमारे दीड-दोन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून अन्य दुकाने पूर्णपणे बंदच होती. परिणामी एवढ्या काळात झालेल्या नुकसानीने व्यापारी चांगलेच अडचणीत आले आहेत. सुदैवाने आता जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट पाय पसरत असून, बाधितांची टक्केवारी नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने अनलॉकच्या यादीत जिल्ह्याचा समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वच दुकानांना आता दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे; तर शनिवारी व रविवारी सर्वच बंद राहणार, असेही आदेश काढण्यात आले आहेत.

शिथिलतेचे आदेश लागू झाल्यानंतर पहिल्याच शनिवारी (दि. ५) मात्र आदेशाची धुडकावणी झाल्याचे शहरात दिसून आले. शनिवारी पूर्ण बंद असतानाही शहरात सर्वच काही सुरू असल्याचे दिसले. त्यात बाजारात नेहमीप्रमाणे सर्व दुकाने सुरू होती व नागरिकांची गर्दीही तेवढीच दिसली. दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी आपला व्यापार करून घेतला व त्यामुळे जिल्हा प्रशासनाला शनिवारी बंदचे आदेश आहेत, याचा विसर पडला की काय, असेच वाटू लागले.

--------------------------

पोलीस गाडी आल्यावर केली दुकाने बंद

शनिवारी दुपारी १ वाजता पोलिसांची गाडी व त्यांनी व्यापाऱ्यांना माईकवरून दुकान बंद करण्यास सांगितल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर खाली पाडले. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे, यात शंका नाही.

-----------------------------------

नियमांकडे दुर्लक्ष नकोच

मागीलवर्षीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी मनमर्जीपणे व्यापार केला. यात मात्र त्यांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आदी नियमांची धुडकावणी केली. परिणामी जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता. त्याचे परिणाम कित्येक व्यापाऱ्यांनाही भोगावे लागले होते. आता सुदैवाने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र मागील वर्षी झालेली चूक पुन्हा होऊ नये एवढे भान मात्र नक्कीच बाळगणे गरजेचे आहे.