शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जबाबदारी कुणाच्या खांद्यावर !

By admin | Updated: December 30, 2016 00:56 IST

तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी,

काळीपिवळी वाहन चालकांची मुजोरी : अल्पवयीनांच्या हातात दुचाकी वाहन आमगाव : तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ नवीन बाब नाही. परंतु या मार्गावर होणारी वर्दळ सुरक्षेला तडा लावत आहे. वाहतुकीची जबाबदारी असलेले विभाग माघारी फिरत असल्याने अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. राज्य सीमेवर असलेले आमगाव शहर छत्तीसगड, मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी व्यवसायाने सुविधाजनक स्थळ आहे. शहरातून राज्य मार्गावरील वाहतूक नियमित आहे. शहरातील आंबेडकर चौक, मानकर गुरुजी चौक, कामठा चौक, गांधी चौक, देवरी मार्ग, गोंदिया मार्ग यावर वाहनांची वर्दळ व नागरिकांची गर्दी असते. वाहनांना थांबा नसला तरी मर्जीप्रमाणे वाहनांची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे पायदळ चालणाऱ्या व्यक्तींना अपघातांना समोर होवून मार्ग काढावा लागतो. शहरातील आंबेडकर चौक येथे काळी-पिवळी वाहनांची वर्दळ सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. काळीपिवळी वाहन चालकांच्या मुजोरशाहीपुढे दुय्यम परिवहन विभाग व पोलीस विभाग हतबल ठरले आहे. या विभागाच्या आपसातील देवाण-घेवाणीपुढे मात्र नागरिकांचा जीव टांगणीला आहे. राज्य मार्गावर धावणारी अनेक काळी-पिवळी वाहने विनापरवाना, विनापार्किंगलाईट, विना लाईटने बिनधास्त राज्य मार्गावर धावत आहेत. परंतु परवाना नुतनीकरण करणारे विभाग फक्त कागदांचा पिठाऱ्यावर परवाना स्वीकारुन मुदत वाढवत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेवणार कोण? असा प्रश्न पुढे आला आहे. शहरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी स्थानिक पोलीस वाहतूक विभागाला पोलीस खात्यानेच नजरबंद केले आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस विभागातील कर्तबगार कर्मचारी आपल्या जबाबदारीपासून पळवाटा काढत असल्याचे पुढे दिसत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर येऊन पडली आहे. अनियमित वाहतूक व अस्तव्यस्त पार्किंग या समस्या शहरात आवासून उभ्या आहेत. शहराच्या मुख्य राज्यमार्गावर रस्ते सीमेलगत वाहन पार्किंगसाठी वाहतूक विभागाने सीमारेषा उतरविल्या होते. परंतु या सीमारेषांच्या आत मुख्य मार्गावर वाहनांची पार्किंग वाहतूक विभागाच्या नजरेसमोर आहे. परंतु कारवाई मात्र शून्य आहे. वाहतुकीच्या कायद्यावर बोट घालण्यासाठी पोलीस विभागाने राज्य परिवहन विभागाकडे कर्तव्य असल्याचे उघडपणे नजरा टाकल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची जबाबदारी सांभाळणारे विभाग कोणते हा विषय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. (शहर प्रतिनिधी)