शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी कुणाच्या खांद्यावर !

By admin | Updated: December 30, 2016 00:56 IST

तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी,

काळीपिवळी वाहन चालकांची मुजोरी : अल्पवयीनांच्या हातात दुचाकी वाहन आमगाव : तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ नवीन बाब नाही. परंतु या मार्गावर होणारी वर्दळ सुरक्षेला तडा लावत आहे. वाहतुकीची जबाबदारी असलेले विभाग माघारी फिरत असल्याने अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. राज्य सीमेवर असलेले आमगाव शहर छत्तीसगड, मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी व्यवसायाने सुविधाजनक स्थळ आहे. शहरातून राज्य मार्गावरील वाहतूक नियमित आहे. शहरातील आंबेडकर चौक, मानकर गुरुजी चौक, कामठा चौक, गांधी चौक, देवरी मार्ग, गोंदिया मार्ग यावर वाहनांची वर्दळ व नागरिकांची गर्दी असते. वाहनांना थांबा नसला तरी मर्जीप्रमाणे वाहनांची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे पायदळ चालणाऱ्या व्यक्तींना अपघातांना समोर होवून मार्ग काढावा लागतो. शहरातील आंबेडकर चौक येथे काळी-पिवळी वाहनांची वर्दळ सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. काळीपिवळी वाहन चालकांच्या मुजोरशाहीपुढे दुय्यम परिवहन विभाग व पोलीस विभाग हतबल ठरले आहे. या विभागाच्या आपसातील देवाण-घेवाणीपुढे मात्र नागरिकांचा जीव टांगणीला आहे. राज्य मार्गावर धावणारी अनेक काळी-पिवळी वाहने विनापरवाना, विनापार्किंगलाईट, विना लाईटने बिनधास्त राज्य मार्गावर धावत आहेत. परंतु परवाना नुतनीकरण करणारे विभाग फक्त कागदांचा पिठाऱ्यावर परवाना स्वीकारुन मुदत वाढवत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेवणार कोण? असा प्रश्न पुढे आला आहे. शहरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी स्थानिक पोलीस वाहतूक विभागाला पोलीस खात्यानेच नजरबंद केले आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस विभागातील कर्तबगार कर्मचारी आपल्या जबाबदारीपासून पळवाटा काढत असल्याचे पुढे दिसत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर येऊन पडली आहे. अनियमित वाहतूक व अस्तव्यस्त पार्किंग या समस्या शहरात आवासून उभ्या आहेत. शहराच्या मुख्य राज्यमार्गावर रस्ते सीमेलगत वाहन पार्किंगसाठी वाहतूक विभागाने सीमारेषा उतरविल्या होते. परंतु या सीमारेषांच्या आत मुख्य मार्गावर वाहनांची पार्किंग वाहतूक विभागाच्या नजरेसमोर आहे. परंतु कारवाई मात्र शून्य आहे. वाहतुकीच्या कायद्यावर बोट घालण्यासाठी पोलीस विभागाने राज्य परिवहन विभागाकडे कर्तव्य असल्याचे उघडपणे नजरा टाकल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची जबाबदारी सांभाळणारे विभाग कोणते हा विषय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. (शहर प्रतिनिधी)