शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पत्रक वाटप

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने घातलेल्या थैमानाचा धसका घेत पालिका प्रशासनच काय तर ग्राम पंचायत प्रशासनही कामावर लागले आहे.

गोंदिया : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने घातलेल्या थैमानाचा धसका घेत पालिका प्रशासनच काय तर ग्राम पंचायत प्रशासनही कामावर लागले आहे. पालिकेने या डासजन्य आजारांच्या जनजागृतीसाठी होर्डिंगबाजीवर भर दिला. तर ग्रामीण भागात मात्र पत्रकं वाटपाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. जवळील ग्राम भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने अंतर्गत येणाऱ्या गावांत पत्रक वाटल्याची माहिती आहे. डेंग्यू व मलेरियाने यंदा चांगलेच थैमान घातले आहे. ग्रामीण भागात याचा जोर जास्त वाटू लागला होता. मात्र शहरातही डेंग्यूचे रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ माजली. डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप एवढा वाढला की दिल्लीची चमू जिल्ह्यात येऊन गेली. डासजन्य या आजारांवर आळा घालण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे हाच एक उपाय आहे. याशिवाय स्वत:च्या संरक्षणासाठी उपाययोजना करून या आजारांपासून बचाव करता येतो. डासांची उत्पत्ती रोखता यावी यासाठी फवारणी करण्याची गरज असते. ग्रामीण भागात हिवताप विभाग यासाठी जबाबदार असतो. तर शहरात मात्र नगर पालिकेकडून हे कार्य केले जाते. शहरात पालिका प्रशासन अयशस्वी ठरल्याने त्यांच्याकडून या आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशातून होर्डींग्स लावण्यात आले. पालिकेच्या या आगळ््यावेगळ््या प्रयोगावर तशा प्रतिक्रियाही शहरवासीयांकडून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र त्याच धर्तीवर आता ग्रामीण भागातही जनजागृतीचे कार्य केले जात आहे. ग्रामीण भागात मात्र यात थोडे अंतर आहे. त्याचे असे की, पालिकेचा कारभार मोठा असल्याने त्यांनी होर्डींग्स लावले. तर ग्राम पंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार त्या तुलनेत लहान असल्याने हे पत्रकं वाटून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. जवळील ग्राम भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानेही हा प्रयोग केल्याचे दिसून आले आहे. केंद्राकडून केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील गावकऱ्यांना डेंग्यू व मलेरियाची माहिती, बचावाचे उपाय, घ्यावयाची काळजी आदी माहिती असलेले पत्रकं वाटण्यात आले आहेत. आपली जबाबदारी पार पाडत सर्वच आपापल्या परीने धडपड करीत आहेत. मात्र जबाबदार विभाग व यंत्रणेकडून पाहिजे ते ठोस पाऊल उचलण्यात येत असल्याने सर्व काही नागरिकांनीच करावे काय असा सवाल उठत आहे. यावरून जिल्हा, शहर व ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मात्र प्रश्नचिन्ह उठतो. (शहर प्रतिनिधी)