शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

माध्यमिक शिक्षण विभाग झाले पोरके

By admin | Updated: September 11, 2016 00:21 IST

मागील वर्षभारापासून माध्यमिक शिक्षण विभोाला शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी नाही.

अधिकाऱ्यांची गरज: मुख्याध्यापकांना काढाव्या लागतात चकरागोंदिया : मागील वर्षभारापासून माध्यमिक शिक्षण विभोाला शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी नाही. तसेच वर्ग २ चे अधिक्षक किंवा लिपीक नसल्यामुळे हे कार्यालय पोरके झाले आहे. या कार्यालयात कामासाठी जिल्ह्यातील ८० ते ९० किमी अंतरावरून येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना काम न होताच परत जावे लागते. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात मागील एक वर्षापासून कायम स्वरूपी शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी नाहीत. विस्तार अधिकारी भंडारा व गोंदियाच्या कारभार सांभाळत होते. परंतु त्यांना गोंदिया गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार देण्यात आल्यामुळे ते ही पद रिक्त आहे. येथील विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले चंद्रिकापुरे यांना काही दिवसापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यामुळे त्यांची ही जागा रिक्त आहे. अधिक्षक या पदावर वर्ग २ चे अधिकारी हवेत. मात्र तालुका समादेशक कावळे यांच्यावर अधिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विज्ञान पर्यवेक्षक नाहीत. परिचराचे पद ही मंजूर नाही. मनुष्यबळाच्या अभावामुळे जिल्ह्यातील ८० ते ९० किमी अंतरावरून येणाऱ्या मुख्याध्यापक किंवा लिपीकांना काम न करताच परत जावे लागते. अधिकारी नसल्यामुळे शिक्षण मंडळाचे काम प्रलंबित आहेत. इयत्ता १० वी व १२ वीचे परीक्षा फार्म भरायचे आहेत. वर्धीत मान्यतेची गरज आहे. परंतु वर्धीत मान्यता न मिळाल्यामुळे ११ वीच्या १ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश थांबला आहे. नैसर्गिक वाढ तुकडी व मंडळ सांकेताक ही प्रकरणे अडलेली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कारभार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. परंतु त्यांच्यावर कामाचा भार असल्यामुळे अनेक कामे माध्यमिक विभागातील होऊ शकली नाही. मुख्याध्यापकांना व लिपीक वर्गांना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वारंवार चकरा काढाव्या लागतात. (तालुका प्रतिनिधी)अनुभवींना प्रभार द्याप्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना कामाचा चांगला अनुभव आहे. मात्र प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडून मेहनत होत असल्यामुळे त्यांच्याकडे माध्यमिक विभागातील कामे करण्यास वेळ उरत नाही. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक व लिपीकांना कार्यालयाच्या चकरा काढताना चपला झिजवाव्या लागत आहेत. शिक्षण विभागात आणखी काही अधिकारी अनुभवी आहेत. किंवा काहींनी कामही केले आहे अश्या व्यक्तींना प्रभार दिल्यास या कार्यालयातील कामे सहजरित्या होतील. कोणतेही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत. याकडे मुकाने लक्ष घालावे.