शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षण विभाग झाले पोरके

By admin | Updated: September 11, 2016 00:21 IST

मागील वर्षभारापासून माध्यमिक शिक्षण विभोाला शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी नाही.

अधिकाऱ्यांची गरज: मुख्याध्यापकांना काढाव्या लागतात चकरागोंदिया : मागील वर्षभारापासून माध्यमिक शिक्षण विभोाला शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी नाही. तसेच वर्ग २ चे अधिक्षक किंवा लिपीक नसल्यामुळे हे कार्यालय पोरके झाले आहे. या कार्यालयात कामासाठी जिल्ह्यातील ८० ते ९० किमी अंतरावरून येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना काम न होताच परत जावे लागते. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात मागील एक वर्षापासून कायम स्वरूपी शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी नाहीत. विस्तार अधिकारी भंडारा व गोंदियाच्या कारभार सांभाळत होते. परंतु त्यांना गोंदिया गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार देण्यात आल्यामुळे ते ही पद रिक्त आहे. येथील विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले चंद्रिकापुरे यांना काही दिवसापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यामुळे त्यांची ही जागा रिक्त आहे. अधिक्षक या पदावर वर्ग २ चे अधिकारी हवेत. मात्र तालुका समादेशक कावळे यांच्यावर अधिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विज्ञान पर्यवेक्षक नाहीत. परिचराचे पद ही मंजूर नाही. मनुष्यबळाच्या अभावामुळे जिल्ह्यातील ८० ते ९० किमी अंतरावरून येणाऱ्या मुख्याध्यापक किंवा लिपीकांना काम न करताच परत जावे लागते. अधिकारी नसल्यामुळे शिक्षण मंडळाचे काम प्रलंबित आहेत. इयत्ता १० वी व १२ वीचे परीक्षा फार्म भरायचे आहेत. वर्धीत मान्यतेची गरज आहे. परंतु वर्धीत मान्यता न मिळाल्यामुळे ११ वीच्या १ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश थांबला आहे. नैसर्गिक वाढ तुकडी व मंडळ सांकेताक ही प्रकरणे अडलेली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कारभार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. परंतु त्यांच्यावर कामाचा भार असल्यामुळे अनेक कामे माध्यमिक विभागातील होऊ शकली नाही. मुख्याध्यापकांना व लिपीक वर्गांना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वारंवार चकरा काढाव्या लागतात. (तालुका प्रतिनिधी)अनुभवींना प्रभार द्याप्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना कामाचा चांगला अनुभव आहे. मात्र प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडून मेहनत होत असल्यामुळे त्यांच्याकडे माध्यमिक विभागातील कामे करण्यास वेळ उरत नाही. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक व लिपीकांना कार्यालयाच्या चकरा काढताना चपला झिजवाव्या लागत आहेत. शिक्षण विभागात आणखी काही अधिकारी अनुभवी आहेत. किंवा काहींनी कामही केले आहे अश्या व्यक्तींना प्रभार दिल्यास या कार्यालयातील कामे सहजरित्या होतील. कोणतेही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत. याकडे मुकाने लक्ष घालावे.