शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

तालुक्यातील शाळांची तंबाखूमुक्तीच्या दिशेने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्याने तंबाखूमुक्त शाळा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १,६५३ शाळांपैकी १,५८५ शाळांनी तंबाखूमुक्त शाळाचे निकष पूर्ण ...

अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्याने तंबाखूमुक्त शाळा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १,६५३ शाळांपैकी १,५८५ शाळांनी तंबाखूमुक्त शाळाचे निकष पूर्ण केल्याने त्यांना तंबाखूमुक्त शाळा घोषित केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व आरोग्य विभागाने तंबाखूमुक्त शाळांचे सुधारित नऊ निकष पारित केले असून, जिल्ह्यातील उर्वरित ९२ शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निकष पूर्ण केले नव्हते. आता या शाळांचे निकष पूर्ण करण्याकरिता नियोजन करण्यात आले असून, या शाळांची तंबाखूमुक्तीच्या दिनेश वाटचाल सुरू असल्याचे गटशिक्षणाधिकारी आर. एल. मांढरे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन व आरोग्य प्रबोधिनी संस्था यांच्या संयुक्तवतीने येथील गटसाधन केंद्रात तंबाखूमुक्त शाळा अभियानाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. बी. पारधी, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, सलाम मुंबईचे समन्वयक संदेश देवरुखकर,आरोग्य प्रबोधिनीचे डॉक्टर सूर्यप्रकाश गभने, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ए. एस. बरईकर, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल चव्हाण, जिल्हा बालरक्षक कुलदीपिका बोरकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक दिलीप बघेले उपस्थित होते. कार्यशाळेत देवरुखकर यांनी, नवीन निकषांची ओळख, मांडणी, ॲपवर अपलोड करण्याच्या पद्धती यावर सविस्तर सादरीकरण केले. डॉ. गभने यांनी, अपलोड करताना येणाऱ्या अडचणींची चर्चा व त्यावरील उपाय योजनांची मांडणी केली. आरती पुराम यांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. संचालन व नियोजन सत्यवान शहारे यांनी केले. प्रास्ताविक विजय काशीवार यांनी मांडले. आभार भास्कर लेंडे यांनी मानले. कार्यशाळेला तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.