शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

दहावी, बारावीच्या मूल्यमापनावर सावरकर यांनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या ...

केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. परंतु अजूनही अनेक शाळांनी परिपत्रकाचे वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली नाही. निकाल जाहीर करण्यात अडचण येऊ नये वेळेच्या आत निकाल जाहीर करता यावे, मूल्यमापन कार्याला गती यावी म्हणून नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शाळांना भेटी देऊन मूल्यमापनासंबंधी मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू असल्याने शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने पहिले ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दहावी व बारावीचा निकाल शाळाअंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात शाळांनी मूल्यमापन कसे करावे, याबाबतीत मार्गदर्शक प्रकटन परिपत्रक जारी केले आहेत. परंतु अजूनही कित्येक शाळांनी परिपत्रकाचे योग्य वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया केली नाही. त्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवोदय हायस्कूल केशोरी, डॉ. राधाकृष्ण हायस्कूल कनेरी, जयदुर्गा हायस्कूल गौरनगर या शाळांना भेटी देऊन विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांना आलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

.....

अडचणींचा वेळीच निपटारा करणार

शिक्षकांच्या सहकार्यानेच दहावी आणि बारावीचा निकाल निर्धारित वेळेच्या आत जाहीर करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजूनही काही शाळांनी परिपत्रक प्रकटनाचे वाचन योग्य पद्धतीने न केल्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया योग्य केली नाही. ज्या शाळांनी प्रकटनाचे वाचन करून समजून घेतले त्यांनी पद्धतशीर मूल्यमापन केल्याचे दिसून आले. मूल्यमापन संदर्भात कोणाला अडचणी आल्यास त्यांनी त्वरित फोनद्वारे संपर्क साधून अडचणी सोडविण्याचे शिक्षकांना आश्वासित केले.

......

बारावी निकाला संदर्भातील मूल्यमापन प्रक्रियेबाबतीत विचारणा केली असता शासन स्तरावर बैठका सुरू आहे. राज्य मंडळाकडून सूचना निर्देश प्राप्त होताच. मूल्यमापन प्रक्रिया पूर्णत्वास करण्यासंबंधी सांगण्यात येईल.

- माधुरी सावरकर, विभागीय सचिव नागपूर.