शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

दहावी, बारावीच्या मूल्यमापनावर सावरकर यांनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या ...

केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. परंतु अजूनही अनेक शाळांनी परिपत्रकाचे वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली नाही. निकाल जाहीर करण्यात अडचण येऊ नये वेळेच्या आत निकाल जाहीर करता यावे, मूल्यमापन कार्याला गती यावी म्हणून नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शाळांना भेटी देऊन मूल्यमापनासंबंधी मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू असल्याने शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने पहिले ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दहावी व बारावीचा निकाल शाळाअंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात शाळांनी मूल्यमापन कसे करावे, याबाबतीत मार्गदर्शक प्रकटन परिपत्रक जारी केले आहेत. परंतु अजूनही कित्येक शाळांनी परिपत्रकाचे योग्य वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया केली नाही. त्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवोदय हायस्कूल केशोरी, डॉ. राधाकृष्ण हायस्कूल कनेरी, जयदुर्गा हायस्कूल गौरनगर या शाळांना भेटी देऊन विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांना आलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

.....

अडचणींचा वेळीच निपटारा करणार

शिक्षकांच्या सहकार्यानेच दहावी आणि बारावीचा निकाल निर्धारित वेळेच्या आत जाहीर करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजूनही काही शाळांनी परिपत्रक प्रकटनाचे वाचन योग्य पद्धतीने न केल्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया योग्य केली नाही. ज्या शाळांनी प्रकटनाचे वाचन करून समजून घेतले त्यांनी पद्धतशीर मूल्यमापन केल्याचे दिसून आले. मूल्यमापन संदर्भात कोणाला अडचणी आल्यास त्यांनी त्वरित फोनद्वारे संपर्क साधून अडचणी सोडविण्याचे शिक्षकांना आश्वासित केले.

......

बारावी निकाला संदर्भातील मूल्यमापन प्रक्रियेबाबतीत विचारणा केली असता शासन स्तरावर बैठका सुरू आहे. राज्य मंडळाकडून सूचना निर्देश प्राप्त होताच. मूल्यमापन प्रक्रिया पूर्णत्वास करण्यासंबंधी सांगण्यात येईल.

- माधुरी सावरकर, विभागीय सचिव नागपूर.