शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या मूल्यमापनावर सावरकर यांनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या ...

केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. परंतु अजूनही अनेक शाळांनी परिपत्रकाचे वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली नाही. निकाल जाहीर करण्यात अडचण येऊ नये वेळेच्या आत निकाल जाहीर करता यावे, मूल्यमापन कार्याला गती यावी म्हणून नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शाळांना भेटी देऊन मूल्यमापनासंबंधी मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू असल्याने शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने पहिले ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दहावी व बारावीचा निकाल शाळाअंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात शाळांनी मूल्यमापन कसे करावे, याबाबतीत मार्गदर्शक प्रकटन परिपत्रक जारी केले आहेत. परंतु अजूनही कित्येक शाळांनी परिपत्रकाचे योग्य वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया केली नाही. त्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवोदय हायस्कूल केशोरी, डॉ. राधाकृष्ण हायस्कूल कनेरी, जयदुर्गा हायस्कूल गौरनगर या शाळांना भेटी देऊन विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांना आलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

.....

अडचणींचा वेळीच निपटारा करणार

शिक्षकांच्या सहकार्यानेच दहावी आणि बारावीचा निकाल निर्धारित वेळेच्या आत जाहीर करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजूनही काही शाळांनी परिपत्रक प्रकटनाचे वाचन योग्य पद्धतीने न केल्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया योग्य केली नाही. ज्या शाळांनी प्रकटनाचे वाचन करून समजून घेतले त्यांनी पद्धतशीर मूल्यमापन केल्याचे दिसून आले. मूल्यमापन संदर्भात कोणाला अडचणी आल्यास त्यांनी त्वरित फोनद्वारे संपर्क साधून अडचणी सोडविण्याचे शिक्षकांना आश्वासित केले.

......

बारावी निकाला संदर्भातील मूल्यमापन प्रक्रियेबाबतीत विचारणा केली असता शासन स्तरावर बैठका सुरू आहे. राज्य मंडळाकडून सूचना निर्देश प्राप्त होताच. मूल्यमापन प्रक्रिया पूर्णत्वास करण्यासंबंधी सांगण्यात येईल.

- माधुरी सावरकर, विभागीय सचिव नागपूर.