शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

साठे महामंडळ ठरतेय ‘शो-पिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 00:56 IST

लोकरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंडळाकडून थेट कर्ज योजना चालविली जाते.

तीन वर्षांपासून कर्ज नाही : महामंडळाचा ढिसाळ कारभार गोंदिया : लोकरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंडळाकडून थेट कर्ज योजना चालविली जाते. मात्र मागील तीन वर्षांपासून महामंडळाकडून बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करवून न दिल्याने त्यात नैराश्याचे वातावरण आहे. यातून महामंडळाला ढिसाळ कारभार उघड पडत असून परिणामी बेरोजदारांनी आता महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज करनेच बंद केल्याची माहिती आहे. महामंडळाच्या थेट कर्ज योजनेंतर्गत सन २०१४-१५ मध्ये बेरोजगारांना कर्जासाठी ४८ प्रकरण मंजूर करण्यात आले होते. शासनाकडून एवढेच अर्ज मंजूर करण्याचे टार्गेट महामंडळाला देण्यात आले होते. मात्र कर्ज प्रकरण मंजूर केल्यानंतरही शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करवून देण्यात आली नाही. परिणामी कर्जाची वाट बघत बेरोजगार त्रस्त झाले आहेत. मात्र एका आशा पल्लवीत असल्याने ते आजही कर्जाची वाट बघत असून खेदाची बाब अशी की, त्यांना याबाबत माहिती देण्यासही कुणी तयार नाही. या वर्षातील मंजूर प्रकरणांत रक्कम तर मिळाली नाही. मात्र सन २०१५-१६ व २०१६-१७ करिता जिल्ह्यात कर्ज देण्याचे टार्गेटच महामंडळाने निर्धारीत केलेले नाही. अशा स्थितीत निधी उपलब्ध करवून देण्याचा प्रश्नच पडत नाही. परिणामी येथील कर्मचारीही आपल्या कामात मग्न असून बेरोजगारांकडून अर्ज घेण्याची तसदीही ते घेत नाहीत. विचारणा केली असता, त्यांनी कुणाही यंदा अर्ज केले नसल्याचे सांगीतले. तर महामंडळातील मुंबईच्या एका संचालकाने एक मोठा भ्रष्टाचार केल्याने त्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे क्वचीत महामंडळाने थेट कर्ज योजनेतून कर्ज देणे बंद केल्याचे सामाजीक न्याय भवनात महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत कर्मचारी सांगत आहेत. यातून ‘करे कोई और भरे कोई’ हाच प्रकार येथे घडत असल्याचे दिसून येत आहे. याच फटका मात्र जिल्ह्यातील बेरोजगारांना भोगाव लागत आहे. अनुदान योजनेत फक्त तीनच प्रकरणे मंजूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून फक्त दोनच योजना चालविल्या जातात. यात थेट कर्ज योजनेशिवाय दुसरी अनुदान योजना आहे. अनुदान योजनेत ५० हजार रूपयांपर्यंतचे कर्ज बेरोजगारांना दिले जाते. त्यात १० हजार रूपयांचे अनुदान असते. आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान महामंडळाकडून जिल्हाला १६ प्रकरणांचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र ५० प्रकरण विविध बँकांना पाठविण्यात आले आहे. तर बँकेकडून फक्त तीनच प्रकरण मंजूर करण्यात आले असून कर्ज वितरीत करण्यात आले आहे. उर्वरीत प्रकरणांबाबत काहीच माहिती नाही.