शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सम्यक महाचर्चा

By admin | Updated: June 22, 2016 01:39 IST

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’

गोंदिया : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’ या विषयावर सम्यक महाचर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमनगर येथे रविवारी पडली. यात विलास राऊत, मोहसीन खान, सुशीला भालेराव, सविता बेदरकर, लिल्हारे आदींनी सहभाग घेतला. महाचर्चेत सविता बेदरकर म्हणाल्या, १ जानेवारी १८२० मध्ये ५०० महारांनी ३० हजार पेशव्यांना भीमा कोरेगाव (पुणे) येथे युद्धात हरविले नसते तर आज आम्हाला शिक्षण घेण्याचे अधिकार कधीही मिळाले नसते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक नवीन वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जावून महार शूरवीर सैनिकांना आदरांजली अर्पण करीत होते. या महार शूरविरांचे महत्त्व समजून बाबासाहेबांनी रक्षा क्षेत्रात महार बटालियनची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मोहसीन खान यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावरील घटनांचे उदाहरण देत म्हणाले, शाहू महाराज कोल्हापूरचे राजा होते. त्यांच्या दरबारी मनुवादी वर्णव्यवस्थेचा विचारक बावर्ची होता. त्यांनी शाहू महाराजांना आपल्या किचनमध्ये तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून येण्यास मनाई केली. याचा वाईट परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. त्यांनी शतकानुशकते शोषित-पीडित, अधिकारापासून वंचित, वर्णव्यवस्थेमध्ये ज्या जाती अडकलल्या होत्या त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या कोल्हापूर संस्थानात सन १९०२ मध्ये आरक्षण लागू केले. त्यामुळे ते भारताचे पहिले आरक्षणाचे जनक बनले. त्यांनी जातीवाद समाप्त करण्यासाठी सन १९१६ मध्ये आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडल्याचे सांगितले.महाचर्चेत विलास राऊत म्हणाले, मनुवाद्यांनी वर्ण व्यवस्था बनवून शतकानुशकते शोषित-पीडित आदिवासी बहुजनांना गुलाम करण्याचे व त्यांना अधिकारापासून वंचित ठेवण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान बनवून आदिवासी-दलित-ओबीसी लोकांना ३४०, ३४१, ३४२ कलमान्वये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार दिले. परंतु आजही शासकवर्ग मनुवादी वर्ण व्यवस्थेत गुंतला असल्याचे सांगितले. यानंतर सुशील भालेराव व लिल्हारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालन राजेश बौद्ध यांनी केले. आभार राजेश भोयर यांनी मानले. (प्रतिनिधी)