शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सम्यक महाचर्चा

By admin | Updated: June 22, 2016 01:39 IST

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’

गोंदिया : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’ या विषयावर सम्यक महाचर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमनगर येथे रविवारी पडली. यात विलास राऊत, मोहसीन खान, सुशीला भालेराव, सविता बेदरकर, लिल्हारे आदींनी सहभाग घेतला. महाचर्चेत सविता बेदरकर म्हणाल्या, १ जानेवारी १८२० मध्ये ५०० महारांनी ३० हजार पेशव्यांना भीमा कोरेगाव (पुणे) येथे युद्धात हरविले नसते तर आज आम्हाला शिक्षण घेण्याचे अधिकार कधीही मिळाले नसते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक नवीन वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जावून महार शूरवीर सैनिकांना आदरांजली अर्पण करीत होते. या महार शूरविरांचे महत्त्व समजून बाबासाहेबांनी रक्षा क्षेत्रात महार बटालियनची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मोहसीन खान यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावरील घटनांचे उदाहरण देत म्हणाले, शाहू महाराज कोल्हापूरचे राजा होते. त्यांच्या दरबारी मनुवादी वर्णव्यवस्थेचा विचारक बावर्ची होता. त्यांनी शाहू महाराजांना आपल्या किचनमध्ये तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून येण्यास मनाई केली. याचा वाईट परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. त्यांनी शतकानुशकते शोषित-पीडित, अधिकारापासून वंचित, वर्णव्यवस्थेमध्ये ज्या जाती अडकलल्या होत्या त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या कोल्हापूर संस्थानात सन १९०२ मध्ये आरक्षण लागू केले. त्यामुळे ते भारताचे पहिले आरक्षणाचे जनक बनले. त्यांनी जातीवाद समाप्त करण्यासाठी सन १९१६ मध्ये आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडल्याचे सांगितले.महाचर्चेत विलास राऊत म्हणाले, मनुवाद्यांनी वर्ण व्यवस्था बनवून शतकानुशकते शोषित-पीडित आदिवासी बहुजनांना गुलाम करण्याचे व त्यांना अधिकारापासून वंचित ठेवण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान बनवून आदिवासी-दलित-ओबीसी लोकांना ३४०, ३४१, ३४२ कलमान्वये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार दिले. परंतु आजही शासकवर्ग मनुवादी वर्ण व्यवस्थेत गुंतला असल्याचे सांगितले. यानंतर सुशील भालेराव व लिल्हारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालन राजेश बौद्ध यांनी केले. आभार राजेश भोयर यांनी मानले. (प्रतिनिधी)