शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST

गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून तिरोडा हे सुद्धा शहर असून नगर परिषदेचे ठिकाण आहे. यामुळे या दोन शहर व ...

गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून तिरोडा हे सुद्धा शहर असून नगर परिषदेचे ठिकाण आहे. यामुळे या दोन शहर व तालुक्यांत सर्वाधिक वर्दळ असते यात शंका नाही. गोंदियात अवघ्या जिल्ह्यासह लगतच्या राज्यातील नागरिकांचेही दररोजचेच आवागमन असते. तिरोडा येथेही यापेक्षा कमी प्रमाणात मात्र शहर असल्याने वर्दळ असते. परिणामी या दोन शहर व तालुक्यांत कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात लॉकडाऊन असले तरी नागरिकांचे घराबाहेर पडणे कमी होत नसून हीच संधी कोरोनाला फोफावण्यास पोषक ठरली. परिणामी गोंदिया व तिरोडा हॉटस्पॉट होते.

मात्र आता सध्याची स्थिती बघता तिरोडा तालुक्यात फक्त ८ क्रियाशील तर गोंदिया तालुक्यात ९५ क्रियाशील रूग्ण आहेत. यावरून या दोन तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असताना दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोना बळावल्याचेही दिसत आहे. कारण, मंगळवारी सालेकसा तालुक्यात १३९, सडक-अर्जुनी तालुक्यात ११२ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १२२ क्रियाशील रूग्ण होते. म्हणजेच क्रियाशील रूग्णांची संख्या शंभरीपार होती.

--------------------------------

तिरोडा तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर

बाधितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व सुरूवातीपासूनच कोरोना हॉटस्पॉट असलेल्या तिरोडा तालुक्यात मंगळवारी फक्त ८ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना उतरतीवर असल्याने बाधितांची संख्या कमी व कोरोनावर मात करणारे जास्त असल्याने व असेच चित्र राहिल्यास तिरोडा तालुका कोरोनामुक्त होऊ शकतो.

-------------------------------

गोंदिया तालुकावासीयांनो खबरदारी घ्या

गोंदिया शहर व तालुका सुरूवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मात्र आता रिकव्हरी रेट वाढल्याने येथे कोरोना नियंत्रणात येताना दिसत आहे. हेच कारण आहे की, २१०६३ एवढी बाधितांची संख्या असताना सध्या ९५ क्रियाशील रूग्ण तालुक्यात शिल्लक आहे. मात्र असे असतानाही कोरोनाचा धोका टळला अशी समजूत बाळगून मनमर्जीपणा करणे धोक्याचे ठरणार आहे. दुसऱ्या लाटेने हे दाखवून दिले असून आता तरी गोंदिया शहर व तालुकावासीयांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.